शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

स्मशानातील वीज पुरवठाच खंडीत, अंधारातच सुरू केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 20:38 IST

नातेवाईंकसह नागरिकांची नाराजी, मृतदेहावर अंधारातच अत्यंसस्कार करण्यास सुरुवात केली होती. 

ठळक मुद्देकल्याण पूर्व भागातील एका वृद्ध महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गुरुवारी रात्री आणण्यात आला होता. त्यावेळी, वीज पुरवठा खंडीत होता, विशेष म्हणजे त्याठिकाणी एकच कर्मचारी उपस्थित होता.

कल्याण - कल्याणच्या पूर्व भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी एक मृतदेह आणण्यात आला होता. मात्र, स्मशानभूमीतील वीज गेल्यामुळे या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास अर्धा तास विलंब झाला. त्यामुळे, नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही वीज नेमकी का गेली, हेच कळले नाही. त्यामुळे, वीज कधी येईल याचा थांगपत्ता नसल्याने नातेवाईकांनी मृतदेहावर अंधारातच अत्यंसस्कार करण्यास सुरुवात केली होती. 

कल्याण पूर्व भागातील एका वृद्ध महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गुरुवारी रात्री आणण्यात आला होता. त्यावेळी, वीज पुरवठा खंडीत होता, विशेष म्हणजे त्याठिकाणी एकच कर्मचारी उपस्थित होता. मृताच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्याकडे वीज खंडीत झाल्याबद्दल विचारले असता त्याच्याकडे समर्पक उत्तर नव्हते. त्यावेळी, वीज कधी सुरू होणार हे मृताच्या नातेवाईकांनाही नीट माहीत नसल्याने नातेवाईकींनी टॉर्चच्या सहाय्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. अर्ध्या तासानंतर त्याठीकाणी एक कर्मचारी आला, त्याने वीज पुरवठा सुरळीत केला. अंत्यसंस्काराचा विधी अंतिम टप्प्यात आल्यावर वीज पुरवठा सुरळित झाला. या घटनेमुळे मृताच्या नातेवाईकांसह उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेची दखल घेत राष्ट्र कल्याण पाटीचे पदाधिकारी राहूल काटकर यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तसेच नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान, यापूर्वीही अशा काही घटना घडलेल्या आहेत. स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिन्यात तांत्रिक बिघाड झाल्याने कोरोना काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटींगला राहावे लागत होते. तसेच डोंबिवलीतील स्मशानभूमीच्या छताचे पत्रे गळके होते. स्मशानभूमी अद्ययावत करण्यासाठी महापालिकेकडून पैसे खर्च केले जातात. मात्र, त्याठिकाणी योग्य सेवा सुविधा पुरविल्या जात नसल्याची बाब या घटनेतून समोर आली आहे. स्मशानभूमीचा पुरवठा खंडीत झाला तरी त्याठिकाणी पर्यायी वीज पुरवठयाची सुविधा किमान अंत्यसंस्कारावेळी तरी असावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेDeathमृत्यू