शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

स्मशानातील वीज पुरवठाच खंडीत, अंधारातच सुरू केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 20:38 IST

नातेवाईंकसह नागरिकांची नाराजी, मृतदेहावर अंधारातच अत्यंसस्कार करण्यास सुरुवात केली होती. 

ठळक मुद्देकल्याण पूर्व भागातील एका वृद्ध महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गुरुवारी रात्री आणण्यात आला होता. त्यावेळी, वीज पुरवठा खंडीत होता, विशेष म्हणजे त्याठिकाणी एकच कर्मचारी उपस्थित होता.

कल्याण - कल्याणच्या पूर्व भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी एक मृतदेह आणण्यात आला होता. मात्र, स्मशानभूमीतील वीज गेल्यामुळे या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास अर्धा तास विलंब झाला. त्यामुळे, नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही वीज नेमकी का गेली, हेच कळले नाही. त्यामुळे, वीज कधी येईल याचा थांगपत्ता नसल्याने नातेवाईकांनी मृतदेहावर अंधारातच अत्यंसस्कार करण्यास सुरुवात केली होती. 

कल्याण पूर्व भागातील एका वृद्ध महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गुरुवारी रात्री आणण्यात आला होता. त्यावेळी, वीज पुरवठा खंडीत होता, विशेष म्हणजे त्याठिकाणी एकच कर्मचारी उपस्थित होता. मृताच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्याकडे वीज खंडीत झाल्याबद्दल विचारले असता त्याच्याकडे समर्पक उत्तर नव्हते. त्यावेळी, वीज कधी सुरू होणार हे मृताच्या नातेवाईकांनाही नीट माहीत नसल्याने नातेवाईकींनी टॉर्चच्या सहाय्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. अर्ध्या तासानंतर त्याठीकाणी एक कर्मचारी आला, त्याने वीज पुरवठा सुरळीत केला. अंत्यसंस्काराचा विधी अंतिम टप्प्यात आल्यावर वीज पुरवठा सुरळित झाला. या घटनेमुळे मृताच्या नातेवाईकांसह उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेची दखल घेत राष्ट्र कल्याण पाटीचे पदाधिकारी राहूल काटकर यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तसेच नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान, यापूर्वीही अशा काही घटना घडलेल्या आहेत. स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिन्यात तांत्रिक बिघाड झाल्याने कोरोना काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटींगला राहावे लागत होते. तसेच डोंबिवलीतील स्मशानभूमीच्या छताचे पत्रे गळके होते. स्मशानभूमी अद्ययावत करण्यासाठी महापालिकेकडून पैसे खर्च केले जातात. मात्र, त्याठिकाणी योग्य सेवा सुविधा पुरविल्या जात नसल्याची बाब या घटनेतून समोर आली आहे. स्मशानभूमीचा पुरवठा खंडीत झाला तरी त्याठिकाणी पर्यायी वीज पुरवठयाची सुविधा किमान अंत्यसंस्कारावेळी तरी असावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेDeathमृत्यू