शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानातील वीज पुरवठाच खंडीत, अंधारातच सुरू केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 20:38 IST

नातेवाईंकसह नागरिकांची नाराजी, मृतदेहावर अंधारातच अत्यंसस्कार करण्यास सुरुवात केली होती. 

ठळक मुद्देकल्याण पूर्व भागातील एका वृद्ध महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गुरुवारी रात्री आणण्यात आला होता. त्यावेळी, वीज पुरवठा खंडीत होता, विशेष म्हणजे त्याठिकाणी एकच कर्मचारी उपस्थित होता.

कल्याण - कल्याणच्या पूर्व भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी एक मृतदेह आणण्यात आला होता. मात्र, स्मशानभूमीतील वीज गेल्यामुळे या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास अर्धा तास विलंब झाला. त्यामुळे, नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही वीज नेमकी का गेली, हेच कळले नाही. त्यामुळे, वीज कधी येईल याचा थांगपत्ता नसल्याने नातेवाईकांनी मृतदेहावर अंधारातच अत्यंसस्कार करण्यास सुरुवात केली होती. 

कल्याण पूर्व भागातील एका वृद्ध महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गुरुवारी रात्री आणण्यात आला होता. त्यावेळी, वीज पुरवठा खंडीत होता, विशेष म्हणजे त्याठिकाणी एकच कर्मचारी उपस्थित होता. मृताच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्याकडे वीज खंडीत झाल्याबद्दल विचारले असता त्याच्याकडे समर्पक उत्तर नव्हते. त्यावेळी, वीज कधी सुरू होणार हे मृताच्या नातेवाईकांनाही नीट माहीत नसल्याने नातेवाईकींनी टॉर्चच्या सहाय्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. अर्ध्या तासानंतर त्याठीकाणी एक कर्मचारी आला, त्याने वीज पुरवठा सुरळीत केला. अंत्यसंस्काराचा विधी अंतिम टप्प्यात आल्यावर वीज पुरवठा सुरळित झाला. या घटनेमुळे मृताच्या नातेवाईकांसह उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेची दखल घेत राष्ट्र कल्याण पाटीचे पदाधिकारी राहूल काटकर यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तसेच नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे. 

दरम्यान, यापूर्वीही अशा काही घटना घडलेल्या आहेत. स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिन्यात तांत्रिक बिघाड झाल्याने कोरोना काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटींगला राहावे लागत होते. तसेच डोंबिवलीतील स्मशानभूमीच्या छताचे पत्रे गळके होते. स्मशानभूमी अद्ययावत करण्यासाठी महापालिकेकडून पैसे खर्च केले जातात. मात्र, त्याठिकाणी योग्य सेवा सुविधा पुरविल्या जात नसल्याची बाब या घटनेतून समोर आली आहे. स्मशानभूमीचा पुरवठा खंडीत झाला तरी त्याठिकाणी पर्यायी वीज पुरवठयाची सुविधा किमान अंत्यसंस्कारावेळी तरी असावी, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेDeathमृत्यू