शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

प्रदूषण हाय हाय... अधिकारी जागेवर न्हाय न्हाय; डोंबिवलीच्या प्रदूषणावर आवाज उठवायला ५६१ नागरिक एकवटले

By अनिकेत घमंडी | Updated: March 5, 2024 10:37 IST

३ हजार नागरिकांना करणार एकत्र; प्रदूषण अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे विचारला जाब

- अनिकेत घमंडी

डोंबिवली : प्रदूषण हाय हाय... नियंत्रण अधिकारी जागेवर न्हाय न्हाय असे म्हणत डोंबिवली एमआयडीसी निवासी आणि आजूबाजूच्या परिसरातील शेकडो नागरिक एकवटले आहेत. त्याना पुन्हा काही महिन्यांपासू रासायनिक प्रदूषणाचा त्रास व्हायला लागला आहे.अहोरात्र मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या प्रदूषणाच्या प्रश्नावर सत्ताधारी, विरोधक नेते काहीही करत नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.

अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने त्यांना प्रत्यक्ष भेटून पत्र देण्याचे आम्ही ठरविले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी तीन वाजता कल्याण येथील कार्यालयात तेथील रहिवासी प्रतिनिधी भालचंद्र म्हात्रे, राजू नलावडे, सागर पाटील, मंदार स्वर्गे  गेले होते। मात्र  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत आणि उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी हे कार्यालयीन कामाकरीता बाहेर गेल्याचे सांगण्यात आले,  तसेच त्यांच्या हाताखालील सबंधित फील्ड ऑफिसर तेही जागेवर नसल्याने त्या त्रस्त रहिवाशांना केवळ निवेदन पत्र  देऊन त्याची पोचपावती घेऊन रिकाम्या हाती परत यावे लागल्याचे नलावडे म्हणाले. आता त्या पत्राची दखल घेऊन अधिकारी काय करतात का की ते केराच्या टोपलीत टाकतात हे बघावे लागेल असा टोला नलावडे यांनी लगावला. 

यातूनही प्रदूषण थांबले नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील सर्व पक्षातील उमेदवारांना याबद्दल जाब विचारण्यात येईल शिवाय येथील रहिवाशांची मीटिंग घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असेही नलावडे म्हणाले.

 समाजमाध्यमांचा आधार घेत त्यांनी त्यांची खंत, वेदना व्यक्त केल्याचे दक्ष नागरिक राजू नलावडे म्हणाले. परंतू दखल कोणी घेत नसून दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली. वरवर मलमपट्टी नको असून प्रश्न तडीस न्यायला हवा असे ते म्हणाले.  त्या समस्येबाबत एमआयडीसी निवासी मधील सामाजिक माध्यमांवर, व्हॉट्सॲप गृपवर त्याची चर्चा होत असल्याने आणि त्याबाबत नागरिकांकडून मोबाईल द्वारे तक्रारी एमपीसीबी कल्याण कार्यालयातील अधिकारी वर्गाला वेळोवेळी केल्या असून त्याचा काही फायदा झाला नसल्याने हजारो नागरिक आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचे ते म्हणाले.

३ हजारी सह्यांचे गाऱ्हाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडणार.... त्या निवेदन पत्रावर नागरिकांचा सह्या घेणे चालू असून आतापर्यंत ५६१ नागरिकांनी उत्स्फूर्त सह्या केल्या असून तीन हजार सह्या घेऊन ते तक्रारींचे निवेदन  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि एमपीसीबीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण