शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

"नरेंद्र मोदी यांचे देशांतर्गत धोरण शेतकरी आणि गरीब विरोधी; हिटलर मेल्याची वार्ता मला खोटी वाटते"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 19:37 IST

पंतप्रधान मोदी यांचे परराष्ट्रीय धोरण चांगले असून त्यांनी चीन व  पाकिस्तान सारखे भारताचे शत्रू थोपवून धरले असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस (Dr Shripal Sabnis) यांनी आज येथे व्यक्त केले. 

कल्याण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशांतर्गत धोरण शेतकरी आणि गरीब विरोधी आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. मात्र परराष्ट्रीय धोरण चांगले असून त्यांनी चीन व  पाकिस्तान सारखे भारताचे शत्रू थोपवून धरले असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस (Dr Shripal Sabnis) यांनी आज येथे व्यक्त केले. 

कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयात लेखक गंगाधर मेश्रम यांच्या ओठावरील हायकूंचा आस्वाद या पुस्तकाचे प्रकाश डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. सबनीस यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. या कार्यक्रमास हायकूकार राजन पोळ, अजित महाडकर, मोसिन मिरसिंगे, सलिम मिरसिंगे आणि भिकू बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. सबनीस यांनी सांगितले की, हिटलर मेल्याची वार्ता मला खोटी वाटते. कारण अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन अणूअस्त्रधारी देशा साम्राज्यवादाची लढाई करीत आहे. त्यामुळे जगातील स्वातंत्र्य आणि शांतता धोक्यात आाली आहे. हे तिन्ही देश हिटलरच्या रुपाने जिवंत आहेत. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुगांतून सुटण्यासाठी दया याचिका पत्र लिहिले होते. हा विषय सध्या चर्चिला जात आहे. याविषयी डॉ. सबनीस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांनी सावरकरांच्या देशभक्तीचा गौरव केला होता. सशस्त्र क्रांती सोडून अहिंसेचा मार्ग धरा असेही सांगितले होते. मात्र सावरकरांच्या हिंदूत्ववादी भूमिकेचे गांधींजीनी समर्थन केलेले नव्हते. महापुरुषांची बदनामी करुन त्यांची राष्ट्रभक्ती ते ब्राह्मण होते म्हणून जानव्यात कुजवावी हे काही बरोबर नाही. त्याचे राजकारण्यांनी भांडवल करावे ही प्रवृती लोकशाहीला घातक आहे. स्वातंत्र्यात सगळ्यांचा सहभाग होता. सावरकरांनी पाच सहा वेळा ब्रिटींशांना पत्र लिहिले. त्यावेळी दया याचनेची पद्धत होती. मात्र त्यांना तुरुंगातून बाहेर येऊन ब्रिटीशांचा प्रतिवाद करायचा होता. या कारणावरुन देशभक्तांची बदनामी करु नये, याकडे डॉ. सबनीय यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShripal Sabnisश्रीपाल सबनीस