शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 06:41 IST

डोंबिवलीतील मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांची माहिती : कर्त्या पुरुषांना दहशतवाद्यांनी वेचून मारले

डोंबिवली (जि. ठाणे) : आम्ही सर्व जण खूश होतो, फोटो काढत होतो. एका ठिकाणी खाण्यासाठी थांबलो तेव्हा फायरिंगचा आवाज ऐकला. आम्हाला वाटले गेम्स चालू असतील. पण, अचानक फायरिंगचे आवाज वाढले. ‘आप लोगोंने आतंक मचा रखा है, हिंदू और मुस्लीम अलग हो जाओ,’ असे बोलत दोन दहशतवाद्यांनी थेट आमच्या घरातील कर्त्या पुरुषांच्या डोक्यात व पोटात गोळ्या मारल्या. हा थरकाप उडवणारा प्रसंग काश्मीरवरून परतलेल्या मोने, लेले व जोशी कुटुंबीयांनी माध्यमांसमोर कथन केला. मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या पर्यटनस्थळी गर्दी असतानाही तिथे एकही लष्कराचा जवान अथवा सुरक्षा रक्षक का नव्हता, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या पार्थिवावर बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. गुरुवारी त्यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. पर्यटक येथे फिरायला येतात, त्यांचा दोष काय होता हे आम्हाला समजले नाही. सरकारने दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का यांनी केली. वडिलांना आमच्यासमोर गोळ्या घालून मारले. खूप वाईट वाटले, संबंधितांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे हेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव म्हणाला.

एनआयए टीमने घेतली तिन्ही कुटुंबांची भेटदहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तिघांच्या कुटुंबांची एनआयएच्या (राष्ट्रीय तपास संस्था) टीमने गुरुवारी डोंबिवलीत भेट घेतली. हल्ल्याच्या दिवशी नेमके काय घडले याबाबत कुटुंबातील सदस्यांचा जबाब एनआयए नोंदवणार आहे. गुरुवारी तिन्ही कुटुंबांच्या घरी जाऊन केवळ भेट घेतली; पण, जबाब नोंदवला नाही. जबाबासाठी पुन्हा येऊ, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

त्यांनी आमचे काहीही न ऐकता गोळ्या घातल्या...संजय लेले यांचा मुलगा हर्षल म्हणाला की, आम्ही सर्व मंगळवारी दुपारी बैसरन घाटीत पोहोचलो. पठारावर जाण्यासाठी तीन तास लागतात. तेथे घोड्यावरूनच जावे लागते. दुपारी दोनच्या सुमारास आम्ही खाऊन निघत असताना अचानक फायरिंगचे आवाज आले. गेम्स चालू असतील म्हणून पहिल्यांदा आम्ही लक्ष दिले नाही. परंतु, थोड्याच वेळात गोळीबार करणारे जवळ आले. स्थानिकांनी आम्हाला खाली झोपून राहायला सांगितले. आम्ही तसे केले. परंतु, तेथे आलेल्या दोघांनी ‘आप लोगोंने यहाँपे आतंक मचा रखा है; हिंदू और मुसलमान अलग हो जाओ,’ असे बोलत वडील, काका, मामाला गोळ्या घातल्या. माझ्या हाताला गोळी चाटून गेली आणि ती वडिलांच्या डोक्यात घुसली. त्यांनी आमचे काही न ऐकता गोळ्या घातल्या. आम्ही काही करू शकलो नाही. 

आईला खांद्यावरून भावंडांनी आणले खालीआम्हाला स्थानिक लोकांनी ‘तुम्ही येथून लगेच निघा आणि तुमचा जीव वाचवा,’ असे सांगितले. माझ्या आईला डाव्या बाजूला लकवा असल्याने तिला भावंडांनी खांद्यावरून तसेच पुढे घोड्यावरून खाली आणले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास खाली पोहोचलो. तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सातच्या सुमारास सांगण्यात आली, सध्या कोणालाही हे सांगू नका, असेही बजावण्यात आले होते. डोंबिवलीतील काका राजेश कदम यांना संपर्क करून ही माहिती दिली. त्यांनी श्रीनगरमधील एका मित्राला फोन केला. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या घरात आमची राहण्याची सोय केली, असा संपूर्ण घटनाक्रम हर्षल लेले याने कथन केला.   

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला