शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बदलापूर आंदोलनामुळे पती १० दिवस जेलमध्ये, पत्नीनं राज ठाकरेंसमोर व्यथा मांडली; मनसेनं मिळवून दिला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 20:31 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेनंतर बदलापुरातील एका आंदोलनकर्त्यांची सुटका झाली आहे.

Badlapur School Crime :बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेच्या नंतर आठवड्याभराने हे प्रकरण समोर आल्याने आणि पोलिसांनी सुरुवातीला योग्य ती कारवाई न केल्यामुळे बदलापुरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत हजार बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. शेकडो आंदोलकांनी तब्बल १० तास बदलापूर स्थानकावर ठिय्या दिला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवले होते. मात्र यानंतर बदलापूर पोलिसांनी कठोर कारवाई करत ३०० जणांवर गुन्हा दाखल केला होता. यापैकी ४० हून अधिक जणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर आंदोलकांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण समोर आणत शाळेतील हा प्रकार उघड केला होता. या घटनेमुळे बदलापूरा जनक्षोभ उसळला होता. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरला भेट दिली होती. भेटीदरम्यान त्यांनी आंदोलनात गुन्हे दाखल असलेल्या पालकांशी, मनसे महिला पदाधिकारी, महिला पत्रकार यांच्याशी संवाद साधला होता. यावेळी एका महिलेने माझेही पती अटकेत असल्याची माहिती राज ठाकरे यांना दिली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश देऊन तात्काळ जामीन मिळवून देण्यास सांगितले होते. अखेर १० दिवसांनी महिलेच्या पतीची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी बदलापूर संवाद दौऱ्यानिमित आंदोलनकर्ते, पालक तसेच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बदलापूरमधील कल्पना मारुती खेडेकर या महिलेने माझे पती ९-१० दिवसांपासून अटकेत आहेत, त्यांची अजून सुटका झाली नाही अशी व्यथा राज ठाकरे यांच्याकडे मांडली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. राज ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनंतर पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर शुक्रवारी महिलेचे पती मारुती महादू खेडेकर यांची चोपडा कोर्ट उल्हासनगर येथून जामिनावर सुटका करण्यात आली. 

टॅग्स :badlapurबदलापूरRaj Thackerayराज ठाकरे