शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

"पगार घेऊनही काम करत नाही, तुम्हाला झोप कशी लागते?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 07:15 IST

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी उडविली अधिकाऱ्यांची झोप

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत एकेक प्रकल्प दहा वर्षे सुरू आहे. त्यांची कामे पूर्ण का होत नाहीत? पालिका अधिकाऱ्यांना पगार देते. तुम्ही पगार घेता ना? मग काम करायला नको? पगार घेऊनही काम करत नाही. तुम्हाला झोप कशी लागते? माझी ही आढावा बैठक गमतीने घेऊ नका. मी दोन महिन्यांत परत येईन. तेव्हा जर कामे झालेली नसली, तर मी कोणाचीही गय करणार नाही, अशा शब्दांत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याने त्यांची झोप उडाली. 

कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या हद्दीतील सोमवारी दिवसभराचा दौरा आटोपल्यानंतर ठाकूर यांनी महापालिका मुख्यालय गाठले. स्मार्ट सिटी कंट्रोल रूमला भेट दिली. त्यानंतर, त्यांनी महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांची चार तास जम्बो मीटिंग पालिकेच्या सभागृहात घेतली. स्मार्ट सिटी, बीएसयूपी योजना, मलनिस्सारण प्रकल्प आदी प्रकल्पांच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, एक-एक प्रकल्प दहा वर्षे सुरू आहे. जर अधिकारी पालिकेकडून पगार घेतात. तो घेतल्यानंतरही त्यांना काम करावेसे वाटत नाही. ही बाब गंभीर आहे. पगार घेऊनही काम न करता, अधिकाऱ्यांना झोप कशी लागते, असा प्रश्न ठाकूर यांनी केला. ही आढावा बैठक कोणत्याही अधिकाऱ्याने गमतीने घेऊ नये. सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामाचा अहवाल मला दिल्लीत जाऊन द्यायचा आहे. 

आता काय अहवाल द्यायचा, हा प्रश्नच आहे. मी पुन्हा दोन महिन्यांनी परत येईन. तेव्हा आता चर्चा झालेल्या प्रकल्पांच्या कामात प्रगती नसेल, तर मी कोणाचीही गय करणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. ठाकूर यांचा रौद्रावतार पाहून भाजपचे नेतेही स्तंभित झाले. अनेक अधिकाऱ्यांना दरदरून घाम फुटला आणि दीर्घकाळ या महापालिकेत सत्तेवर राहिलेल्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्यासह मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, संजय केळकर आदी उपस्थित होते.

ही शहरे स्मार्ट आहेत?शहरांची बकाल अवस्था पाहिलेली असल्याने कल्याण-डोंबिवली ही शहरे स्मार्ट सिटी प्रकल्पात आहेत, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. येथील रस्ते खराब आहेत. त्यावर खड्डे आहेत. शहरात स्वच्छता नाही. अशा परिस्थितीत स्मार्ट सिटीचे काय काम झाले, असा प्रश्न त्यांनी केला.  

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरBJPभाजपाkdmcकल्याण डोंबिवली महापालिका