शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल, टीव्ही बघू दिला नाही, रागात घरातून पळाले; ११ महिन्यात १८७ मुलांनी घर सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 11:07 IST

देशभरातून रेल्वेने आलेली १८७ मुले उतरली कल्याण, डोंबिवलीत  

अनिकेत घमंडी

डोंबिवली : खेळायला मोबाइल दिला नाही.. टीव्ही बघू दिला नाही.. अभ्यासाच्या कारणावरून आईवडील रागावले.. पालकांमधील भांडणं.. अशा एक ना अनेक क्षुल्लक अथवा गंभीर कारणांमुळे तसेच चित्रपटांमध्ये काम करण्याचे, बॉलिवूडमधील फिल्म स्टार्सना भेटण्याच्या इच्छेमुळे मुले, मुली घरातून पळून मुंबईत येण्याच्या घटना वाढत आहेत. ही मुले बरेचदा कल्याण रेल्वे जंक्शनवर उतरतात.

गेल्या ११ महिन्यांत कल्याण, डोंबिवली रेल्वेस्थानकात लोहमार्ग पोलिसांना किरकोळ कारणास्तव घर सोडून आलेली १८७ मुले आढळली आहेत. त्यापैकी १८५ मुले पोलिसांनी स्वगृही पाठवली.  पोलिसांच्या नजरेस न पडलेल्या व परिणामी वेगवेगळ्या अनैतिक धंदे, व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलांची गणतीच नाही. 

अशी वाट चुकलेली मुले पोलिसांच्या नजरेस पडली तर त्यांची घरवापसी होते. मात्र जर ती रेल्वेस्थानकातून बाहेर पडली तर भीक मागण्यापासून अमली पदार्थ विक्रीपर्यंत आणि वेश्याव्यवसायापासून चोऱ्यामाऱ्या करण्यापर्यंत अनेक गैरमार्गाला लागतात. ही सर्व मुले साधारण ८ ते १७ वयोगटांतील असून, महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमधून देशभरातून लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून येतात. घरातून पळून जाण्यापूर्वी मुंबई, ठाणे, कल्याण येथील नातलग किंवा मित्राशी संधान साधून ती आली असतील तर पोलिस त्यांना शोधू शकत नाहीत. 

१८७ पैकी १८५ मुले स्वगृहीपळून आलेली मुले पोलिसांच्या किंवा दक्ष प्रवासी यांच्या निदर्शनास येतात. प्रवासात भुकेल्या असलेल्या मुलांना आधी खायला, पाणी प्यायला देऊन भयमुक्त केले जाते. थोडा वेळ जाऊ दिला की, ती खरी माहिती देतात. माहिती मिळाल्यावर अशा मुलांच्या पालकांना  बोलावून घेतले जाते. खातरजमा करून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलांना पालकांच्या स्वाधीन केले जाते.

येथून आली मुले-मुलीमहाराष्ट्रातून नांदेड, कोल्हापूर, नागपूर आदी भागांतून मुले पळून आली. तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांतूनही मुले मुंबईत पळून आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

असे केले जाते समुपदेशनरेल्वेस्थानकात उतरलेली मुले प्लॅटफॉर्मवरील उपाहारगृह, पाणपोई, पादचारी पूल, तिकीट घर आदी ठिकाणी आडोशाला उभी राहतात. पोलिस, दक्ष नागरिक यांनी या मुलांना हेरल्यावर पोलिस त्यांचा ताबा घेतात. मोठी मुले माहिती देतात, लहान मुलांना बोलते करण्यात समुपदेशकाची महत्त्वाची भूमिका असते.

कल्याणमध्ये लांबपल्ल्याच्या गाड्या देशभरातून येतात, त्यामुळे तेथे विविध कारणांमुळे पळून आलेली लहान मुले-मुली आढळून येण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. शेकडो मुले कायद्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केली आहेत. सहप्रवाशांनीही अशी मुले आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. - अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण जीआरपी