शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

मोबाइल, टीव्ही बघू दिला नाही, रागात घरातून पळाले; ११ महिन्यात १८७ मुलांनी घर सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 11:07 IST

देशभरातून रेल्वेने आलेली १८७ मुले उतरली कल्याण, डोंबिवलीत  

अनिकेत घमंडी

डोंबिवली : खेळायला मोबाइल दिला नाही.. टीव्ही बघू दिला नाही.. अभ्यासाच्या कारणावरून आईवडील रागावले.. पालकांमधील भांडणं.. अशा एक ना अनेक क्षुल्लक अथवा गंभीर कारणांमुळे तसेच चित्रपटांमध्ये काम करण्याचे, बॉलिवूडमधील फिल्म स्टार्सना भेटण्याच्या इच्छेमुळे मुले, मुली घरातून पळून मुंबईत येण्याच्या घटना वाढत आहेत. ही मुले बरेचदा कल्याण रेल्वे जंक्शनवर उतरतात.

गेल्या ११ महिन्यांत कल्याण, डोंबिवली रेल्वेस्थानकात लोहमार्ग पोलिसांना किरकोळ कारणास्तव घर सोडून आलेली १८७ मुले आढळली आहेत. त्यापैकी १८५ मुले पोलिसांनी स्वगृही पाठवली.  पोलिसांच्या नजरेस न पडलेल्या व परिणामी वेगवेगळ्या अनैतिक धंदे, व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलांची गणतीच नाही. 

अशी वाट चुकलेली मुले पोलिसांच्या नजरेस पडली तर त्यांची घरवापसी होते. मात्र जर ती रेल्वेस्थानकातून बाहेर पडली तर भीक मागण्यापासून अमली पदार्थ विक्रीपर्यंत आणि वेश्याव्यवसायापासून चोऱ्यामाऱ्या करण्यापर्यंत अनेक गैरमार्गाला लागतात. ही सर्व मुले साधारण ८ ते १७ वयोगटांतील असून, महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमधून देशभरातून लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून येतात. घरातून पळून जाण्यापूर्वी मुंबई, ठाणे, कल्याण येथील नातलग किंवा मित्राशी संधान साधून ती आली असतील तर पोलिस त्यांना शोधू शकत नाहीत. 

१८७ पैकी १८५ मुले स्वगृहीपळून आलेली मुले पोलिसांच्या किंवा दक्ष प्रवासी यांच्या निदर्शनास येतात. प्रवासात भुकेल्या असलेल्या मुलांना आधी खायला, पाणी प्यायला देऊन भयमुक्त केले जाते. थोडा वेळ जाऊ दिला की, ती खरी माहिती देतात. माहिती मिळाल्यावर अशा मुलांच्या पालकांना  बोलावून घेतले जाते. खातरजमा करून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलांना पालकांच्या स्वाधीन केले जाते.

येथून आली मुले-मुलीमहाराष्ट्रातून नांदेड, कोल्हापूर, नागपूर आदी भागांतून मुले पळून आली. तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांतूनही मुले मुंबईत पळून आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

असे केले जाते समुपदेशनरेल्वेस्थानकात उतरलेली मुले प्लॅटफॉर्मवरील उपाहारगृह, पाणपोई, पादचारी पूल, तिकीट घर आदी ठिकाणी आडोशाला उभी राहतात. पोलिस, दक्ष नागरिक यांनी या मुलांना हेरल्यावर पोलिस त्यांचा ताबा घेतात. मोठी मुले माहिती देतात, लहान मुलांना बोलते करण्यात समुपदेशकाची महत्त्वाची भूमिका असते.

कल्याणमध्ये लांबपल्ल्याच्या गाड्या देशभरातून येतात, त्यामुळे तेथे विविध कारणांमुळे पळून आलेली लहान मुले-मुली आढळून येण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. शेकडो मुले कायद्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केली आहेत. सहप्रवाशांनीही अशी मुले आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. - अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण जीआरपी