शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मोबाइल, टीव्ही बघू दिला नाही, रागात घरातून पळाले; ११ महिन्यात १८७ मुलांनी घर सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 11:07 IST

देशभरातून रेल्वेने आलेली १८७ मुले उतरली कल्याण, डोंबिवलीत  

अनिकेत घमंडी

डोंबिवली : खेळायला मोबाइल दिला नाही.. टीव्ही बघू दिला नाही.. अभ्यासाच्या कारणावरून आईवडील रागावले.. पालकांमधील भांडणं.. अशा एक ना अनेक क्षुल्लक अथवा गंभीर कारणांमुळे तसेच चित्रपटांमध्ये काम करण्याचे, बॉलिवूडमधील फिल्म स्टार्सना भेटण्याच्या इच्छेमुळे मुले, मुली घरातून पळून मुंबईत येण्याच्या घटना वाढत आहेत. ही मुले बरेचदा कल्याण रेल्वे जंक्शनवर उतरतात.

गेल्या ११ महिन्यांत कल्याण, डोंबिवली रेल्वेस्थानकात लोहमार्ग पोलिसांना किरकोळ कारणास्तव घर सोडून आलेली १८७ मुले आढळली आहेत. त्यापैकी १८५ मुले पोलिसांनी स्वगृही पाठवली.  पोलिसांच्या नजरेस न पडलेल्या व परिणामी वेगवेगळ्या अनैतिक धंदे, व्यवसायात ओढल्या गेलेल्या मुलांची गणतीच नाही. 

अशी वाट चुकलेली मुले पोलिसांच्या नजरेस पडली तर त्यांची घरवापसी होते. मात्र जर ती रेल्वेस्थानकातून बाहेर पडली तर भीक मागण्यापासून अमली पदार्थ विक्रीपर्यंत आणि वेश्याव्यवसायापासून चोऱ्यामाऱ्या करण्यापर्यंत अनेक गैरमार्गाला लागतात. ही सर्व मुले साधारण ८ ते १७ वयोगटांतील असून, महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमधून देशभरातून लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून येतात. घरातून पळून जाण्यापूर्वी मुंबई, ठाणे, कल्याण येथील नातलग किंवा मित्राशी संधान साधून ती आली असतील तर पोलिस त्यांना शोधू शकत नाहीत. 

१८७ पैकी १८५ मुले स्वगृहीपळून आलेली मुले पोलिसांच्या किंवा दक्ष प्रवासी यांच्या निदर्शनास येतात. प्रवासात भुकेल्या असलेल्या मुलांना आधी खायला, पाणी प्यायला देऊन भयमुक्त केले जाते. थोडा वेळ जाऊ दिला की, ती खरी माहिती देतात. माहिती मिळाल्यावर अशा मुलांच्या पालकांना  बोलावून घेतले जाते. खातरजमा करून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलांना पालकांच्या स्वाधीन केले जाते.

येथून आली मुले-मुलीमहाराष्ट्रातून नांदेड, कोल्हापूर, नागपूर आदी भागांतून मुले पळून आली. तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यांतूनही मुले मुंबईत पळून आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

असे केले जाते समुपदेशनरेल्वेस्थानकात उतरलेली मुले प्लॅटफॉर्मवरील उपाहारगृह, पाणपोई, पादचारी पूल, तिकीट घर आदी ठिकाणी आडोशाला उभी राहतात. पोलिस, दक्ष नागरिक यांनी या मुलांना हेरल्यावर पोलिस त्यांचा ताबा घेतात. मोठी मुले माहिती देतात, लहान मुलांना बोलते करण्यात समुपदेशकाची महत्त्वाची भूमिका असते.

कल्याणमध्ये लांबपल्ल्याच्या गाड्या देशभरातून येतात, त्यामुळे तेथे विविध कारणांमुळे पळून आलेली लहान मुले-मुली आढळून येण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. शेकडो मुले कायद्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केली आहेत. सहप्रवाशांनीही अशी मुले आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. - अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण जीआरपी