शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

‘त्या’ पक्षप्रवेशावर भाजपा आमदारांनी व्यक्त केली खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 15:29 IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ येऊ लागल्याने राजकीय घडामोडी घडायला सुरवात झाकी आहे.

लोकमत  न्यूज नेटवर्क : कल्याण  

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ येऊ लागल्याने राजकीय घडामोडी घडायला सुरवात झाकी आहे. भाजपाचे तीन नगरसेवक / नगरसेविका  या शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. यावर आता डोंबिवलीचे भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित आम्ही कुठे तरी कमी पडलो  अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात भाजपाचे काही नगरसेवक सेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर या पक्षप्रवेशावर आज शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातं आहे. कल्याणात आज महाविकास आघाडी सरकारविरोधात काढलेल्या मोर्चानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आमदार चव्हाण यांनी खंत व्यक्त केली आहे. भाजपाचे कार्यकर्ते, एवढी वर्षे ज्यांनी पक्षात काम केले असे काम करणारे कार्यकर्ते सोडून जातात. त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख होत असल्याचे ते म्हणाले. तर भारतीय जनता पक्ष ते का सोडून चालले आहेत, याचे कारण त्यांनाच माहीत असावे. मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख वाटते की आम्ही कुठे तरी कमी पडलो की काय? अस सांगत त्यांनी सेनेत जाणाऱ्या नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्याकडूनच पक्षप्रवेशाची माहिती मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता केडीएमसीमध्ये वर्षानुवर्षे सत्ता उपभोगणारे सेना आणि भाजप आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाElectionनिवडणूकBJPभाजपा