शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

खदान मृत्यू प्रकरण: 'आम्हाला पैसे नको, पाणी द्या, गायकवाड कुटुंबाने रामदास आठवलेंना सुनावले खडेबोल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 20:20 IST

Ramdas Athavale News: देसलेपाडा येथील गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा संदप गावातील खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 7 मे ला घडली होती. बुधवारी त्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करायला गेलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आम्हाला मदत नको, पाणी दया अशा शब्दात खडे बोल कुटुंबाने सुनावले.

डोंबिवली - देसलेपाडा येथील गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा संदप गावातील खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 7 मे ला घडली होती. बुधवारी त्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करायला गेलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आम्हाला मदत नको, पाणी दया अशा शब्दात खडे बोल कुटुंबाने सुनावले. संतापलेले कुटुंब आणि त्यावेळी झालेला गोंधळ पाहता आठवलेंना तेथून काढता पाय घ्यावा लागला.

पाच जणांच्या बाबतीत घडलेल्या दुर्घटनेनंतर गावातील पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने समोर आली होती. दरम्यान आतार्पयत खासदार, आमदार आणि राजकीय पक्षातील पदाधिका-यांनी गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन पाणी देण्याचे आश्वासन दिली. पाणी टंचाईमुळे कुटुंबातील पाच जणांचा जीव गमवावा लागला पण राजकारणी केवळ आश्वासन देतात पण पाणी काही देत नाहीत, आजही पाणी विकत घेऊनच त्याचा वापर करावा लागत आहे हा संताप बुधवारी गायकवाड कुटुंबानी बोलून दाखविला.

गायकवाड कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जेव्हा आठवले आले तेव्हा त्यांनी गावाला भेडसावणा-या पाणी समस्येबाबत मार्ग काढण्यासाठी आयुक्त तसेच जिल्हाधिका-यांशी चर्चा केल्याचे सांगितले, पुढे बोलताना आठवलेंनी कुटुंबाला 50 हजार रूपयांची मदत करण्याचे आश्वासन देताच कुटुंबातील सदस्य संतापले ‘आम्हाला 50 हजार नको, पाणी द्या’ आमच्या घरातले जीव पाण्यावाचून गेलेत ते भरून तुम्ही देणार आहात का? दुर्घटना घडल्यानंतर पाणी मिळणे गरजेचे होते पण आमदार खासदार आले पण केवळ आश्वासन देऊन गेले. पण काही केले नाही. आजही आम्ही पाणी विकत घेतोय, पुन्हा अशा घडणार नाहीत याची दक्षता घ्या, खदाणी बंद करा, त्याला कुंपण घाला, लॉक करा, आम्हाला देणगीची गरज नाही, पाण्याची गरज आहे. तुम्ही येता सगळे सांत्वन करण्यासाठी ते आम्हाला पटत नाही अशा शब्दात आठवले यांना कुटुंबातील सदस्यांनी सुनावले. यावेळी अनपेक्षित झालेल्या गोंधळाने रिपाईचे पदाधिकारी आणि पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले. तर संभाजी राजे शिवसेनेत जातीलछत्रपती संभाजी राजेंना यांना कोणत्या पक्षात जायचे असेलतर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र शिवसेना राज्यसभेची उमेदवारी देत असलेतर ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना यापुर्वी भाजपने राज्यसभा दिली होती. त्यामुळे त्यांनी भाजपमध्येच राहीले पाहिजे असा सल्लाही आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkalyanकल्याण