शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खदान मृत्यू प्रकरण: 'आम्हाला पैसे नको, पाणी द्या, गायकवाड कुटुंबाने रामदास आठवलेंना सुनावले खडेबोल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 20:20 IST

Ramdas Athavale News: देसलेपाडा येथील गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा संदप गावातील खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 7 मे ला घडली होती. बुधवारी त्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करायला गेलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आम्हाला मदत नको, पाणी दया अशा शब्दात खडे बोल कुटुंबाने सुनावले.

डोंबिवली - देसलेपाडा येथील गायकवाड कुटुंबातील पाच जणांचा संदप गावातील खदाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना 7 मे ला घडली होती. बुधवारी त्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन करायला गेलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना आम्हाला मदत नको, पाणी दया अशा शब्दात खडे बोल कुटुंबाने सुनावले. संतापलेले कुटुंब आणि त्यावेळी झालेला गोंधळ पाहता आठवलेंना तेथून काढता पाय घ्यावा लागला.

पाच जणांच्या बाबतीत घडलेल्या दुर्घटनेनंतर गावातील पाणी टंचाईची समस्या प्रकर्षाने समोर आली होती. दरम्यान आतार्पयत खासदार, आमदार आणि राजकीय पक्षातील पदाधिका-यांनी गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन पाणी देण्याचे आश्वासन दिली. पाणी टंचाईमुळे कुटुंबातील पाच जणांचा जीव गमवावा लागला पण राजकारणी केवळ आश्वासन देतात पण पाणी काही देत नाहीत, आजही पाणी विकत घेऊनच त्याचा वापर करावा लागत आहे हा संताप बुधवारी गायकवाड कुटुंबानी बोलून दाखविला.

गायकवाड कुटुंबियांच्या सांत्वनासाठी जेव्हा आठवले आले तेव्हा त्यांनी गावाला भेडसावणा-या पाणी समस्येबाबत मार्ग काढण्यासाठी आयुक्त तसेच जिल्हाधिका-यांशी चर्चा केल्याचे सांगितले, पुढे बोलताना आठवलेंनी कुटुंबाला 50 हजार रूपयांची मदत करण्याचे आश्वासन देताच कुटुंबातील सदस्य संतापले ‘आम्हाला 50 हजार नको, पाणी द्या’ आमच्या घरातले जीव पाण्यावाचून गेलेत ते भरून तुम्ही देणार आहात का? दुर्घटना घडल्यानंतर पाणी मिळणे गरजेचे होते पण आमदार खासदार आले पण केवळ आश्वासन देऊन गेले. पण काही केले नाही. आजही आम्ही पाणी विकत घेतोय, पुन्हा अशा घडणार नाहीत याची दक्षता घ्या, खदाणी बंद करा, त्याला कुंपण घाला, लॉक करा, आम्हाला देणगीची गरज नाही, पाण्याची गरज आहे. तुम्ही येता सगळे सांत्वन करण्यासाठी ते आम्हाला पटत नाही अशा शब्दात आठवले यांना कुटुंबातील सदस्यांनी सुनावले. यावेळी अनपेक्षित झालेल्या गोंधळाने रिपाईचे पदाधिकारी आणि पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले. तर संभाजी राजे शिवसेनेत जातीलछत्रपती संभाजी राजेंना यांना कोणत्या पक्षात जायचे असेलतर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र शिवसेना राज्यसभेची उमेदवारी देत असलेतर ते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना यापुर्वी भाजपने राज्यसभा दिली होती. त्यामुळे त्यांनी भाजपमध्येच राहीले पाहिजे असा सल्लाही आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेkalyanकल्याण