शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मदनगड संवर्धन मोहीम यशस्वीपणे पडली पार;

By मुरलीधर भवार | Updated: March 16, 2024 15:02 IST

दुपारचे जेवण करून परत एकदा जोमाने कामाला सुरुवात झाली संध्याकाळ पर्यंत नियोजन केले होते त्याच्या पेक्षा कैपटीने जास्तच काम सदस्यानं करण्यात आले होते.

कल्याण-मदन गड संवर्धन माेहिम गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेतर्फे नुकतीच पार पडली. या दोन दिवसीय मोहिमेत ८ सदस्यांनी सहभाग घेतला. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एकमेव वनदुर्ग असलेल्या वांजळे गावच्या मागच्या बाजूला मदगड आहे.

रितसर महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाची पत्र देऊन परवानगी घेण्यात आली होती रात्रीचा गाडीने प्रवास करून संस्थेचे सदस्य मध्यरात्री वांजळे गावात पोहचले, पहाटे पर्यंत थोडा वेळ गावातील मंदिरात आराम करून सकाळी चहा - नाश्ता उरकून काम करायचे सर्व साहित्य आणि दुपारच्या जेवणाचे सगळे सामान घेऊन मदगड किल्ल्यावर पोहचले. कुठे आणि काय काम करायचे आहे याची पाहणी आणि नियोजक करून सकाळी कामाला सुरुवात झाली. किल्ल्यावरील वाड्यांचे जोत्यावर वाढलेली झाडी - झुडपे काढण्यात आली आणि सर्व परिसर मोकळा करण्यात आला.

दुपारचे जेवण करून परत एकदा जोमाने कामाला सुरुवात झाली संध्याकाळ पर्यंत नियोजन केले होते त्याच्या पेक्षा कैपटीने जास्तच काम सदस्यानं करण्यात आले होते. संध्याकाळी दिवसभराचे काम थांबाऊन सगळे सदस्य गावात परत आले. गावच्या सरपंचांना भेटून दिवसभर केलेल्या कामाची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सदस्य गडाकडे मार्गस्थ झाले. किल्ल्यावर करतं असलेले संवर्धनाचे काम बघायला ७५ वर्षाचे वांजळे गावाचे सरपंच आत्माराम गायकर, बोर्ली पंचायतन शिवसेना शाखाप्रमुख गजू भाटकर यांनी भेट देऊन काम करणाऱ्या सदस्यांचा उत्साह वाढवला होता. या मोहिमेत वांजळे गावाचे उत्साही ग्रामस्थ भालचंद्र जाधव यांनी सहभाग घेतला. मोहिमेत गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेचे मंगेश कोयंडे, दिगंबर पाटील, अनिश खाडे, राजू घोळे, मंगेश ठाकूर, शहाजी घाग, हेमंत लाड आणि आरती गुरव सहभागी झाले होते.

मदगड किल्ल्याचे संवर्धन व्यवस्थित झाले तर हा किल्ला पर्यटनाचे केंद्रबिंदू होऊ शकतो. वांजळे गावाला एक वेगळी ओळख निर्माण होईल. अनेक पर्यटक आणि ट्रेकर या किल्ल्याला भेट देतील आणि गावातील आणि परिसरातील लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल. ह्या किल्ल्यापासून काही अंतरावर दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर ही निसर्गसंपन्न पर्यटन गावं आहेत आणि हा किल्ला अग्रस्थानी असेल.