शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

कल्याण-कसारा तिसऱ्या मार्गाचे 50 टक्केच भूसंपादन; १३ वर्षांपासून केंद्र, राज्य शासन समन्वयाच्या अभावाचा फटका

By अनिकेत घमंडी | Updated: July 20, 2024 06:20 IST

या गतीने काम होणार असेल तर आणखी दहा वर्षे लागतील.

डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या मार्गाचे १३ वर्षांत अवघे ५० टक्केच भूसंपादन झाले आहे. केंद्र, राज्य शासन त्या मार्गाचा विकास करण्यात हात आखडता घेत आहे, असा आरोप कल्याण-कसारा व कर्जत (के-थ्री) या रेल्वे प्रवासी संघटनेने केला. त्यांनी याबाबत दिल्लीत रेल्वे बोर्डाकडे माहिती मागवली असता कामाच्या कूर्मगतीचे गुपित उघड झाले. या गतीने काम होणार असेल तर आणखी दहा वर्षे लागतील.

संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी सांगितले की, सातत्याने पाठपुरावा करूनही माहिती दिली जात नाही. त्यामुळे कल्याण-कसारा तिसरा मार्ग कुठे अडकला? स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवली जात असताना नेमके घोडे अडले कुठे, असा सवाल त्यांनी केला. कल्याण-कसारा या ६७.३५ किलोमीटर मार्गावर तिसऱ्या लाइनला २०११ मध्ये मंजुरी मिळाली, त्यासाठी सुमारे १४३५.६१ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे पत्रात म्हटले आहे. केवळ ५० टक्के भूसंपादन काम झाले असून, अजून काम सुरू असल्याचे घनघाव म्हणाले.

गेल्या १३ वर्षांत कामाची फारशी प्रगती झालेली नसून ही विकासाच्या दृष्टीने वाटचाल नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला न्याय मिळायला हवा, इथला प्रवासी पिचला जात असून त्याला होणारा त्रास, वेदना त्याचे काहीच मूल्यमापन नाही का, अशा शब्दांत घनघाव यांनी नाराजी व्यक्त केली.

...तरच जलद लोकल

कल्याण-कसारा चौथी लाइनबाबत मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन काम बघत असून त्यांचेही काम सुरू असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच कल्याण बदलापूर ३/४ था मार्गाचे काम एमआरव्हीसी बघत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अद्याप या मार्गांवरील मार्गिकेचा पत्ता नसल्यानेही कामे कधी होणार, याकडे कोणाचेही लक्ष नाही. गर्दीचे विभाजन होणार तरी कसे? गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्ग वाढवायला हवेत तरच जलद लोकल भविष्यात बदलापूर, आसनगाव मार्गावर धावतील अन्यथा कठीण होईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वे