शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी KDMC ची विक्रमी वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 18:07 IST

KDMC : ही वसुली महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी वसूली असल्याचा प्रशासनाने दावा केला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रकीय उद्दिष्ट 425 कोटी असताना मालमत्ता कर संकलन विभागाने एकूण 427.50 कोटी विक्रमी वसुली केली आहे. पालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने दि.31 मार्च रोजी एका ‍दिवसात तब्बल 10. 78 कोटींची वसूली करून या आर्थिक वर्षात एकूण 427 कोटीहून अधिक  वसुली केली आहे. ही वसुली महापालिकेच्या इतिहासातील विक्रमी वसूली असल्याचा प्रशासनाने दावा केला आहे. (KDMC's record recovery on the last day of the financial year)

15 ऑक्टोबर 2020 ते 15 जानेवारी 2021 या 3 महिन्याचे कालावधीकरीता 75 % व्याज माफीची अभय योजना  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आली होती. या योजनेला करदात्यांनी उत्तम प्रतिसाद देत  या कालावधीत  230.85 कोटी वसूलीस हातभार लावला होता. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक व त्यांच्या कर्मचारी वर्गाने देखील पाणी बिलांच्या वसुली पोटी एकूण 66.94 कोटीची वसुली केली आहे. गतवर्षी ही वसूली 61.10 कोटी  इतकी होती. कोरोना साथीच्या या कठीण परिस्थितीतही महापालिकेच्या करदात्यांनी करांचा भरणा करुन महापालिकेस केलेल्या सहकार्याबाबत महापालिकेने  करदात्या नागरिकांचे आभार मानले आहेत. 

'करवसुली झाली असली तरी, शहरातील समस्याही लवकर मार्गी लावाव्यात'केडीएमसीचे आयुक्त डॉ  विजय सूर्यवंशी यांनी अनेकदा  आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. वास्तविक पाहता कोरोना काळात संपूर्ण यंत्रणा वेगवेगळ्या कामात गुंतलेली असताना कर वसुली करणे सोपे नव्हते. परंतु पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना इतर कामांना गती  मिळणे देखील आवश्यक होते. सूर्यवंशी यांच्या  कणखर नेतृत्वामुळे ही करवसुली झाली असली तरी शहरातील पाणी, रस्ते व कचरा समस्याही लवकरात लवकर मार्गी लावाव्यात अशी अपेक्षा करदाते नागरिक करत आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका