शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

केडीएमसी आरोग्य विभाग सतर्क; उष्माघात कक्ष सज्ज

By सचिन सागरे | Updated: April 6, 2024 19:18 IST

हवामान विभागाने नुकतीच उष्णतेची लाट येणार असल्याचे भाकीत केले आहे.

कल्याण : पुढील काही दिवसात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी अलर्ट झाली असून केडीएमसीने रुक्मिणीबाई रुग्णालयात आजपासून उष्माघात (हिट स्ट्रोक) कक्ष सज्ज ठेवला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने महापालिका सतर्क झाली आहे.

शहरात सकाळपासून सायंकाळपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत आहे. उन्हामुळे नागरिकांच्या तब्येतीत बिघाड होत असल्याची उदाहरणे आहेत. यामुळे, केडीएमसीच्या आरोग्य विभागामार्फत उष्माघात कक्ष सज्ज करण्यात आला आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात उष्माघात कक्षात दोन खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कक्षात एक डॉक्टर व एक नर्स असणार आहे. हवामान विभागाने नुकतीच उष्णतेची लाट येणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यानुसार केडीएमसीने ही खबरदारी घेतली आहे.   

 उष्मघाताची कारणे :

-भर उन्हाळ्यात कमी पाणी पिऊन घराबाहेर पडले तर उष्मघात होईल, तसेच पाण्याच्या अभावामुळे होणाऱ्या अनेक रोगांचा सामना करावा लागेल. थायरॉईडची समस्या असेल तर उन्हात उष्माघात होण्याची शक्यता असते. थायरॉईड असंतुलनामुळे रक्तदाब बदलल्यास थकवा जाणवतो. जंकफूडमध्ये मोनोसोडियम, ग्लुटामेंटसह गरम आणि हानिकारक पदार्थ असतात. ज्यामुळे, शरीर उष्माघाताचा सामना करू शकत नाही.

--

*प्राथमिक लक्षणे काय?

-थकवा येणे, उच्च अथवा कमी रक्तदाब, चक्कर येणे, उलट्या होणे, स्नायूंमध्ये कडकपणा, सतत घाम येणे, त्वचेवर पुरळ, डोकेदुखी, श्वास घेण्यास समस्या, भीती व अस्वस्थ वाटणे.

 उष्‍णतेचा त्रास झाल्‍यास याचे करा पालन :

 उन्हात बाहेर जाणे टाळा, चहा, कॉफी व गरम पदार्थ टाळा, शरीरात तापमान सामान्य राखण्यासाठी पाण्याची कमतरता येऊ देऊ नये, दिवसातून २ ते ३ लिटर पाणी प्या, हलक्‍या रंगाचे, सैल कपडे घाला, अधिक प्रमाणात व्‍यायाम करणे टाळा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 अनेक वेळा तापमानात होणारे बदल किंवा बदलणारे ऋतू यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. उन्हाळा या ऋतूमध्ये तापमान अधिक वाढते. यामुळे, उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी, जास्तीत जास्त पाणी पिण्याबरोबरच डोक्यावर रुमाल अथवा टोपी वापरावी. थोडेही लक्षण जाणवले की, जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. – डॉ. ज्योती भांगरे, भूलतज्ञ, रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका