शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी आरोग्य विभाग सतर्क; उष्माघात कक्ष सज्ज

By सचिन सागरे | Updated: April 6, 2024 19:18 IST

हवामान विभागाने नुकतीच उष्णतेची लाट येणार असल्याचे भाकीत केले आहे.

कल्याण : पुढील काही दिवसात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसी अलर्ट झाली असून केडीएमसीने रुक्मिणीबाई रुग्णालयात आजपासून उष्माघात (हिट स्ट्रोक) कक्ष सज्ज ठेवला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने महापालिका सतर्क झाली आहे.

शहरात सकाळपासून सायंकाळपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत आहे. उन्हामुळे नागरिकांच्या तब्येतीत बिघाड होत असल्याची उदाहरणे आहेत. यामुळे, केडीएमसीच्या आरोग्य विभागामार्फत उष्माघात कक्ष सज्ज करण्यात आला आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात उष्माघात कक्षात दोन खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कक्षात एक डॉक्टर व एक नर्स असणार आहे. हवामान विभागाने नुकतीच उष्णतेची लाट येणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यानुसार केडीएमसीने ही खबरदारी घेतली आहे.   

 उष्मघाताची कारणे :

-भर उन्हाळ्यात कमी पाणी पिऊन घराबाहेर पडले तर उष्मघात होईल, तसेच पाण्याच्या अभावामुळे होणाऱ्या अनेक रोगांचा सामना करावा लागेल. थायरॉईडची समस्या असेल तर उन्हात उष्माघात होण्याची शक्यता असते. थायरॉईड असंतुलनामुळे रक्तदाब बदलल्यास थकवा जाणवतो. जंकफूडमध्ये मोनोसोडियम, ग्लुटामेंटसह गरम आणि हानिकारक पदार्थ असतात. ज्यामुळे, शरीर उष्माघाताचा सामना करू शकत नाही.

--

*प्राथमिक लक्षणे काय?

-थकवा येणे, उच्च अथवा कमी रक्तदाब, चक्कर येणे, उलट्या होणे, स्नायूंमध्ये कडकपणा, सतत घाम येणे, त्वचेवर पुरळ, डोकेदुखी, श्वास घेण्यास समस्या, भीती व अस्वस्थ वाटणे.

 उष्‍णतेचा त्रास झाल्‍यास याचे करा पालन :

 उन्हात बाहेर जाणे टाळा, चहा, कॉफी व गरम पदार्थ टाळा, शरीरात तापमान सामान्य राखण्यासाठी पाण्याची कमतरता येऊ देऊ नये, दिवसातून २ ते ३ लिटर पाणी प्या, हलक्‍या रंगाचे, सैल कपडे घाला, अधिक प्रमाणात व्‍यायाम करणे टाळा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखून तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 अनेक वेळा तापमानात होणारे बदल किंवा बदलणारे ऋतू यामुळे आपल्या शरीराला वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. उन्हाळा या ऋतूमध्ये तापमान अधिक वाढते. यामुळे, उष्माघात होण्याची दाट शक्यता असते. अशावेळी, जास्तीत जास्त पाणी पिण्याबरोबरच डोक्यावर रुमाल अथवा टोपी वापरावी. थोडेही लक्षण जाणवले की, जवळच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. – डॉ. ज्योती भांगरे, भूलतज्ञ, रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका