शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

27 गावातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर! नगरसेवकासह संतप्त नागरिकांनी पेटवला कचरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:24 IST

Kalyan Dombivali Garbage Disposal Issue : कल्याण नजीक असलेल्या नांदीवली परिसरात संतप्त नागरिकांनी साचलेला कचरा पेटवून देत आपला संताप व्यक्त केला आहे.

कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत कचऱ्याचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आलाय. 27 गावात देखील कचरा उचलला जात नसल्यानं घाणीच साम्राज्य निर्माण झालंय. त्यामुळे कल्याण नजीक असलेल्या नांदीवली परिसरात संतप्त नागरिकांनी साचलेला कचरा पेटवून देत आपला संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने दखल घेतली नाही तर यापुढे उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी दिला.

कचऱ्याच्या प्रश्नासंदर्भात वारंवार केडीएमसी प्रशासनाला सांगून सुद्धा काही उपयोग झाला नाही. नागरीकांच्या कचऱ्यावरून तक्रारी येतायेत. त्यांना काय उत्तर द्यायचे? असा प्रश्न  स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या  27 गावांपैकी 18 गावे पालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारन घेतला. 

9 गाव पालिकेतच आहेत. गाव वगळण्याचा निर्णय न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे येत्या काळात या गावांबद्दल नेमका काय निर्णय घेतला जातो ते पाहावं लागेल. तसेच येथील कचऱ्याच्या प्रश्न ही पेटण्याची चिन्ह निर्माण झालीत. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न