शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांनी खुलासा करून प्रकरण मिटवणे गरजेचे होते- दीपक केसरकर

By पंकज पाटील | Updated: December 9, 2022 18:22 IST

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू आहे वाद

पंकज पाटील, अंबरनाथ: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी जे विधान केले होते त्या विधानाबाबत राज्यपालांनी योग्य वेळी योग्य खुलासा केला असता तर वातावरण शमले असते, असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

अंबरनाथ येथे उभारण्यात आलेला साईबाबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी राज्यपालांच्या विधानाबाबत विचारणा केले असता दीपक केसरकर यांनी राज्यपालांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण करणे गरजेचे होते. या आधी देखील त्यांच्याकडून अनेक विधाने केली गेली होती त्यावरून देखील वादंग निर्माण झाला होता. मात्र अशा परिस्थितीत त्यांनी योग्य वेळी योग्य खुलासा करून प्रकरण मिटवले होते. मात्र छत्रपतींच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबत अद्याप त्यांनी योग्य खुलासा न केल्यामुळे त्यांच्यावर नाराजीचा सूर कायम आहे.

राज्यपालांच्या विधानाबाबत केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाबाबत त्यांना विचारले असता, आधीच्या सरकारने सीमेवरील गावांना सुविधा देणे बंद केले होते. आमच्या सरकारने त्या सुविधा पुन्हा सुरू केल्या आहेत. यासोबतच सर्वोच्च न्यायालयात देखील या प्रकरणाला गती मिळाली आहे. अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारचा विरोध हा होणारच होता. मात्र या प्रकरणात राजकारण न करता सीमावाद कसा मिटेल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. चौकट: अंबरनाथच्या कार्यक्रमाच्या आधी केसरकर यांनी बदलापुरातील शिवभक्त शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली तसेच त्यांच्या शालेय शिक्षणाबाबतच्या काय अपेक्षा आहेत हे देखील जाणून घेतले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtraमहाराष्ट्र