शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

राज्यपालांनी खुलासा करून प्रकरण मिटवणे गरजेचे होते- दीपक केसरकर

By पंकज पाटील | Updated: December 9, 2022 18:22 IST

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू आहे वाद

पंकज पाटील, अंबरनाथ: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी जे विधान केले होते त्या विधानाबाबत राज्यपालांनी योग्य वेळी योग्य खुलासा केला असता तर वातावरण शमले असते, असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

अंबरनाथ येथे उभारण्यात आलेला साईबाबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी राज्यपालांच्या विधानाबाबत विचारणा केले असता दीपक केसरकर यांनी राज्यपालांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण करणे गरजेचे होते. या आधी देखील त्यांच्याकडून अनेक विधाने केली गेली होती त्यावरून देखील वादंग निर्माण झाला होता. मात्र अशा परिस्थितीत त्यांनी योग्य वेळी योग्य खुलासा करून प्रकरण मिटवले होते. मात्र छत्रपतींच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबत अद्याप त्यांनी योग्य खुलासा न केल्यामुळे त्यांच्यावर नाराजीचा सूर कायम आहे.

राज्यपालांच्या विधानाबाबत केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाबाबत त्यांना विचारले असता, आधीच्या सरकारने सीमेवरील गावांना सुविधा देणे बंद केले होते. आमच्या सरकारने त्या सुविधा पुन्हा सुरू केल्या आहेत. यासोबतच सर्वोच्च न्यायालयात देखील या प्रकरणाला गती मिळाली आहे. अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारचा विरोध हा होणारच होता. मात्र या प्रकरणात राजकारण न करता सीमावाद कसा मिटेल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. चौकट: अंबरनाथच्या कार्यक्रमाच्या आधी केसरकर यांनी बदलापुरातील शिवभक्त शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली तसेच त्यांच्या शालेय शिक्षणाबाबतच्या काय अपेक्षा आहेत हे देखील जाणून घेतले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtraमहाराष्ट्र