शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

डोंबिवलीत स्वतंत्र रिक्षा प्रवास आता १ रुपयाने महागणार, आधीच २० रुपये घेत होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 17:12 IST

डोंबिवलीकराना खऱ्या अर्थाने नियमानुसार स्वतंत्र रिक्षा प्रवासासाठी २० ऐवजी १ रुपया जादा द्यावा लागेल.

अनिकेत घमंडी 

परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षा भाडेमध्ये ३ रुपयांची वाढ जाहीर केली असल्याने पहिल्या टप्प्यासाठी १८ ऐवजी आता २१ रुपये मोजावे लागणार आहेत, त्यामुळे डोंबिवलीकराना खऱ्या अर्थाने नियमानुसार स्वतंत्र रिक्षा प्रवासासाठी २० ऐवजी १ रुपया जादा द्यावा लागेल. काही वर्षे डोंबिवलीकर पहिल्या टप्प्यासाठी मीटर नसताना स्वतंत्र रिक्षा केली तर २० रुपये मोजत होते, त्यात आता १ रुपया वाढणार असल्याचे लाल बावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमासकर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. तसेच पहिल्या टप्प्याला आता जे १० रुपये शेअर भाड्यात आकारले जातात त्यातही वाढ होणार नसल्याचे ते म्हणाले, परंतु लांबच्या टप्प्यात काहीशी वाढ होण्याची शक्यता असून त्याबाबत आरटीओने सर्व्हे करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

२०१४ पासून रोखून धरलेली प्रलंबित व कायदेशीर हक्काची रिक्षा-टँक्सी ची भाडेवाढ दिल्याबद्दल लालबावटा रिक्षा युनियन तर्फे या भाववाढीचे त्यांनी स्वागत केले. २०१४ पासून सरकारने रिक्षा -टँक्सी चालकांना भाडेवाढ दिली नव्हती. जगातील सर्व वस्तूंच्या किंमती झपाट्याने वाढत आहेत. फक्त रिक्षा-टँक्सी ची भाडेवाढ रोखण्यात आली होती. रिक्षा-टँक्सी भाडेवाढी बाबत हकीम समिती व खटुआ समीतीच्या शिफारशी राज्य सरकारने स्विकारलेल्या असताना सरकारने आठ वर्षे रिक्षा-टँक्सी ची भाववाढ रोखून धरली होती.

आठ वर्षे महाराष्ट्रातील विविध रिक्षा-टँक्सी संघटना या भाववाढीची मागणी करीत होत्या. २०२०मद्ये मार्च पासून लाँकडाऊन मुळे सहा महिने तर रिक्षा-टँक्सी पूर्णपणे बंद होत्या. सहा महिन्यानंतर सुरू करूनही ट्रेन, शाळा,काँलेज इत्यादी बंद असल्याने रिक्षा-टँक्सी रस्त्यावर धावत होत्या परंतु पन्नास टक्के धंदा मार खाल्ला होता. एक महिन्यापासून थोड्या प्रमाणात ट्रेन, शाळा, काँलेज सुरू झाल्या. तरीही धंदा पूर्वी सारखा होत नसे, त्यातच आता पुन्हा कोरोनाची संख्या वाढत असल्याने भाडेवाढ होऊनही रिक्षा-टँक्सी चालकांना काही महिने पोटभर धंदा मिळेल का? याबाबत प्रश्नच असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून रिक्षा, टँक्सी चालक मालक सावकारी कर्जात मोठ्या प्रमाणात अडकला आहे. तसेच वित्त कंपनीच्या गुंडांनी कर्जदार रिक्षा चालकांना धंदा करणे व जगणे मुश्कील केले आहे.

रिक्षा-टँक्सी चालकांच्या अशा वाईट परिस्थितीत २०१४ पासूनची प्रलंबित व कायदेशीर हक्काची भाववाढ देऊन, सरकारने रिक्षा चालकांना फार मोठा दिलासा देऊन भाडेवाढीचा प्रश्न सोडवला आहे. या बद्दल परिवहन मंत्री अनिल परब यांचे डोंबिवलीतील हजारो रिक्षा चालकांच्या वतीने त्यांनी आभार मानले. 

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाAutomobileवाहनkalyanकल्याणdombivaliडोंबिवली