शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्यास तुरुंगवास; गस्तीवरील पोलिसांना संशय आल्याने बिंग फुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 16:20 IST

कल्याण : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे नऊ वर्षांपूर्वी अपहरण केल्याप्रकरणी आरोपी राजा नायर याला ...

कल्याण : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे नऊ वर्षांपूर्वी अपहरण केल्याप्रकरणी आरोपी राजा नायर याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी शिक्षा ठोठावली आहे.

मुलगी अल्पवयीन असताना तिच्या पालकांच्या रखवालीतून तिला बंगळुरू येथे पळवून नेल्याच्या आरोपाखाली नायर याला पाच वर्षांची कैद आणि पाच हजार रुपयांचा दंड तसेच तिला राज्यातील अन्य भागांत फिरवून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याच्या आरोपाखाली आठ वर्षांची कैद सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने अधिक कारावास भोगावा लागेल. या दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. न्यायालयात सरकार पक्षातर्फे एस. जे. बठेजा यांनी बाजू मांडली.

नऊ वर्षांपूर्वी मुलगी कल्याणला काही कामानिमित्त गेली होती. तेव्हा तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या नायर याने तिचे अपहरण केले. मुलगी घरी न परतल्याने तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम रणदिवे यांनी तक्रार दाखल खरून घेत तिचा शोध घेतला. मुलीच्या तक्रारीनुसार नायरच्या विरोधात अपहरण, फसवणूक, छळाची तक्रार दाखल होऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कल्याण न्यायालयात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. आरोपी, साक्षीदार, तक्रारदार यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने नायर याला शिक्षा ठोठावली आहे.

गस्तीवरील पोलिसांना संशय आल्याने बिंग फुटले

नायर हा त्या मुलीला घेऊन महाराष्ट्राच्या विविध भागांत फिरत होता. त्यानंतर तो तिला बंगळुरूला घेऊन गेला. तिथे फिरत असताना गस्तीवरील पोलिसांना त्याचा संशय आला. त्याला हटकले असता तो गडबडला. अधिक चौकशी केला असता त्याचे बिंग फुटले. बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक करून मानपाडा पोलिसांच्या हवाली केले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण