शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

आयरे गावातील ५०० पूरग्रस्तांना तात्काळ मदत करा, मंदार टावरेंची तहसीलदारांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 16:39 IST

Dombivali : अनेकांचे संसार उघड्यावर पडले, त्यामुळे त्यांना शासनाकडून तात्काळ मदतकार्य अपेक्षित असून तेथील नागरीक उपेक्षित राहू नये अशी मागणी टावरे यांनी केली.

डोंबिवली: आयरे गावात यंदाही खाडीचे पाणी घराघरात घुसून ५०० नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. २०१९ मध्येही असं घडलं होतं, मात्र त्यावेळी तातडीनं नागरिकांना तहसीलदार अधिकाऱ्यांनी तत्कालीन युती सरकारच्या आदेशाने अर्थ, अन्नधान्य मदत कार्य पोहोचवले होते, तसेच आताही मिळावे अशी मागणी माजी नगरसेवक, माजी स्थायी समिती सदस्य मंदार टावरे यांनी तहसीलदार दीपक काकडे यांना सोमवारी केली. त्या ठिकाणी सुमारे ५०० घर पाण्याखाली होती, त्या नागरिकांचे खूप हाल झाले. त्यांचे देखील संसार पाण्याखाली गेले. 

अनेकांचे संसार उघड्यावर पडले, त्यामुळे त्यांना शासनाकडून तात्काळ मदतकार्य अपेक्षित असून तेथील नागरीक उपेक्षित राहू नये अशी मागणी टावरे यांनी केली. समता नगर, सहकार नगर, श्रीराम नगर, गणेश प्रसाद चाळ, कोपर पूर्व परिसर, बेडसिंग मैदान आदी परिसरातील रहिवाश्यांचा त्यात समावेश आहे. 

तत्कालीन युती सरकारने सुमारे दोन महिने पुरेल एवढा शिधा पूरग्रस्तांना दिला होता, तेवढाच किंबहुना लॉकडाऊन परिस्थिती बघता त्याहून जास्त सहकार्य केले जावे, अशी अपेक्षा टावरे यांनी व्यक्त केली. त्यावर तहसीलदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून नुकसान झालेल्याना शासकीय निकषानुसार नियमात बसत असल्यास निश्चित सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली