शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाशिवाय बेकायदा बांधकामे होऊच शकत नाहीत- राजू पाटील

By प्रशांत माने | Updated: November 30, 2022 18:28 IST

बेकायदा बांधकामांबाबत अनेकदा मनपाला पत्रव्यवहार केले आहेत.

कल्याण: शहरात साधी झोपडी उभी राहीली तर तत्काळ कारवाई होते परंतू बेकायदेशीरपणे टोलेजंग इमारती बिनदिककतपणे उभ्या राहतात अधिका-यांच्या आशिर्वादाशिवाय अशी कामे होऊच शकत नाहीत असा आरोप मनसेचे आमदार प्रमोद (राजू ) पाटील यांनी बुधवारी केला. पाटील त्यांच्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील खोळंबलेल्या विकासकामांबाबत आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी केडीएमसी मुख्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी महारेरा फसवणूकीबाबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनपा अधिका-यांना लक्ष केले.

बेकायदा बांधकामांबाबत अनेकदा मनपाला पत्रव्यवहार केले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रारी केल्या आहेत. २७ गावांमध्ये कोणतेही धोरण नव्हते. आरक्षणामुळे स्थानिक भूमिपुत्रांना जागाच राहीली नव्हती. ज्या भूमिपुत्रांनी बांधकाम केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यांची बांधकामेही तोडली पण ती उभी राहताना त्याकडे दुर्लक्ष करणा-या अधिका-यांवर काय कारवाई झाली असा सवाल पाटील यांनी केला. तसेच अशा बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या अधिका-यांवर कारवाई होण्यासाठी देखील महारेरा फसणूक प्रकरण उघडकीस आणणा-या संदीप पाटील यांनी लढावे असे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले.रिंगरूट बाधितांना चांगला मोबदला मिळावा

कल्याण ग्रामीणमधील रिंगरूट बाधितांना चांगला मोबदला मिळाला पाहिजे जेणोकरून रिंगरूटच्या कामांना गती येईल. पलावा येथील मालमत्ता करातही सवलत मिळाली पाहिजे. तसेच पाणी प्रश्नाबाबत आयुक्तांशी चर्चा केल्याचे आमदार पाटील म्हणाले. कल्याण डोंबिवलीत चालू असलेल्या कामांचा दर्जा हा निष्कृष्ठ आहे. स्मार्ट सिटी ही फक्त कल्याणसाठी आहे डोंबिवलीतील एका सिग्नलला चार सिग्नल लावले आहेत. डोंबिवली शहराचा स्मार्ट सिटीत समावेश न केल्याबाबत ही आम्ही  वारंवार आवाज उठविले आहेत. परंतू कल्याणमध्ये चालू असलेल्या कामांवर लक्ष देणे गरजेचे आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील सॅटीस तातडीने होण्याबरोबरच तेथील वाहतूक कोंडीवर लवकरात तोडगा निघायला पाहिजे याकडेही पाटील यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका