शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सरकारची इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळेल, राजू पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

By प्रशांत माने | Updated: November 2, 2023 17:25 IST

पाटील यांनी डोंबिवलीत साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

डोंबिवली: राज्य सरकारची मराठयांना आरक्षण देण्याची सध्याची भुमिका सकारात्मक असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल तर नक्कीच मराठयांना आरक्षण मिळेल असे प्रतिपादन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले. पाटील यांनी डोंबिवलीत साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मत मांडले.

पाटील पुढे म्हणाले याआधी राज्य सरकार आरक्षणाबाबत स्पष्टपणे बोलतं नव्हते. वरवरचे बोलले जात होतं. परंतु बुधवारच्या सर्वपक्षीय बैठकीत ब-याचशा बाबी स्पष्ट झाल्या. मराठा समाज मागासलेला आहे हे सिध्द करावे लागेल तसेच आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल या बाबी सरकारने करायला हव्यात. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठयांना आरक्षण दयावे लागेल यासाठी काही वेळ लागणार आहे. राज्य सरकारने सत्य परिस्थिती मराठा समाजाला विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर मांडणे गरजेचे आहे. आंदोलनकर्त्यांनी देखील आपले जीव धोक्यात न घालता सत्य परिस्थिती जाणून घ्यायला हवी. सर्वपक्षीय बैठकीत सरकार हे आरक्षण देण्याबाबत सकारात्मक असल्याचे जाणवले असून समाजाने सरकारला देखील वेळ दयायला हवा. आत्महत्या, उपोषणासारखे प्रकार न करता सामंजस्याची भुमिका घ्यावी, समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल असे पाटील म्हणाले.

अंगाशी आले की आमचे खांदे वापरले जातात

सरकारच्या अगांशी एखादे प्रकरण आल्याशिवाय ते सर्वपक्षीय बैठक बोलावत नाहीत. त्यांच्या अंगाशी आल्यावर त्यांना आमचे खांदे पाहिजे असतात. पण महाराष्ट्राचा विचार करून सर्वजण एकत्र आले आहेत. वस्तुस्थिती सरकारने यापुर्वीच विश्वासात घेऊन सांगायला हवी होती. त्यामुळे पहिली बैठक निष्फळ ठरली असावी. दुस-या बैठकीत मात्र वस्तुस्थिती समोर आली आहे. सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवून त्यांना थोडा अवधी दयायला हवा असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMNSमनसे