शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सरकारची इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळेल, राजू पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

By प्रशांत माने | Updated: November 2, 2023 17:25 IST

पाटील यांनी डोंबिवलीत साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

डोंबिवली: राज्य सरकारची मराठयांना आरक्षण देण्याची सध्याची भुमिका सकारात्मक असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल तर नक्कीच मराठयांना आरक्षण मिळेल असे प्रतिपादन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले. पाटील यांनी डोंबिवलीत साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मत मांडले.

पाटील पुढे म्हणाले याआधी राज्य सरकार आरक्षणाबाबत स्पष्टपणे बोलतं नव्हते. वरवरचे बोलले जात होतं. परंतु बुधवारच्या सर्वपक्षीय बैठकीत ब-याचशा बाबी स्पष्ट झाल्या. मराठा समाज मागासलेला आहे हे सिध्द करावे लागेल तसेच आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल या बाबी सरकारने करायला हव्यात. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठयांना आरक्षण दयावे लागेल यासाठी काही वेळ लागणार आहे. राज्य सरकारने सत्य परिस्थिती मराठा समाजाला विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर मांडणे गरजेचे आहे. आंदोलनकर्त्यांनी देखील आपले जीव धोक्यात न घालता सत्य परिस्थिती जाणून घ्यायला हवी. सर्वपक्षीय बैठकीत सरकार हे आरक्षण देण्याबाबत सकारात्मक असल्याचे जाणवले असून समाजाने सरकारला देखील वेळ दयायला हवा. आत्महत्या, उपोषणासारखे प्रकार न करता सामंजस्याची भुमिका घ्यावी, समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल असे पाटील म्हणाले.

अंगाशी आले की आमचे खांदे वापरले जातात

सरकारच्या अगांशी एखादे प्रकरण आल्याशिवाय ते सर्वपक्षीय बैठक बोलावत नाहीत. त्यांच्या अंगाशी आल्यावर त्यांना आमचे खांदे पाहिजे असतात. पण महाराष्ट्राचा विचार करून सर्वजण एकत्र आले आहेत. वस्तुस्थिती सरकारने यापुर्वीच विश्वासात घेऊन सांगायला हवी होती. त्यामुळे पहिली बैठक निष्फळ ठरली असावी. दुस-या बैठकीत मात्र वस्तुस्थिती समोर आली आहे. सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवून त्यांना थोडा अवधी दयायला हवा असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMNSमनसे