शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांना आरक्षण मिळेल, राजू पाटील यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

By प्रशांत माने | Updated: November 2, 2023 17:25 IST

पाटील यांनी डोंबिवलीत साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

डोंबिवली: राज्य सरकारची मराठयांना आरक्षण देण्याची सध्याची भुमिका सकारात्मक असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारची इच्छाशक्ती असेल तर नक्कीच मराठयांना आरक्षण मिळेल असे प्रतिपादन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केले. पाटील यांनी डोंबिवलीत साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे मत मांडले.

पाटील पुढे म्हणाले याआधी राज्य सरकार आरक्षणाबाबत स्पष्टपणे बोलतं नव्हते. वरवरचे बोलले जात होतं. परंतु बुधवारच्या सर्वपक्षीय बैठकीत ब-याचशा बाबी स्पष्ट झाल्या. मराठा समाज मागासलेला आहे हे सिध्द करावे लागेल तसेच आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल या बाबी सरकारने करायला हव्यात. अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठयांना आरक्षण दयावे लागेल यासाठी काही वेळ लागणार आहे. राज्य सरकारने सत्य परिस्थिती मराठा समाजाला विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर मांडणे गरजेचे आहे. आंदोलनकर्त्यांनी देखील आपले जीव धोक्यात न घालता सत्य परिस्थिती जाणून घ्यायला हवी. सर्वपक्षीय बैठकीत सरकार हे आरक्षण देण्याबाबत सकारात्मक असल्याचे जाणवले असून समाजाने सरकारला देखील वेळ दयायला हवा. आत्महत्या, उपोषणासारखे प्रकार न करता सामंजस्याची भुमिका घ्यावी, समाजाला आरक्षण नक्कीच मिळेल असे पाटील म्हणाले.

अंगाशी आले की आमचे खांदे वापरले जातात

सरकारच्या अगांशी एखादे प्रकरण आल्याशिवाय ते सर्वपक्षीय बैठक बोलावत नाहीत. त्यांच्या अंगाशी आल्यावर त्यांना आमचे खांदे पाहिजे असतात. पण महाराष्ट्राचा विचार करून सर्वजण एकत्र आले आहेत. वस्तुस्थिती सरकारने यापुर्वीच विश्वासात घेऊन सांगायला हवी होती. त्यामुळे पहिली बैठक निष्फळ ठरली असावी. दुस-या बैठकीत मात्र वस्तुस्थिती समोर आली आहे. सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवून त्यांना थोडा अवधी दयायला हवा असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणMNSमनसे