शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

गणेशोत्सवासाठी रेल्वेने जायचे कसे, तुम्हीच सांगा...तिकिटांचा आढावा घ्या : आ. राजू पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 08:13 IST

गणपतीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या हजारो मुंबईकर चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा आधार असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : गणरायाच्या आगमनाच्या दोन दिवस आधीचे म्हणजेच १७ सप्टेंबरचे रेल्वेचे आरक्षण शुक्रवारी अवघ्या काही मिनिटांत फुल्ल झाले. कोकण रेल्वे व कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांत आता या दिवसाचे एकही आरक्षित तिकीट शिल्लक नाही. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली असताना दलालांमुळे यंदाही कोकणची वाट बिकटच ठरणार आहे. या आरक्षित तिकिटांचा आढावा घ्यावा आणि कोकणवासीयांसाठी नवीन गाड्यांचे नियोजन करून कोकणवासीयांच्या कोकण प्रवासाचा ‘श्री गणेशा’ करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली. 

गणपतीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या हजारो मुंबईकर चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा आधार असतात. १७ सप्टेंबर या प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले होते. पहिल्याच दिवशी अवघ्या तीन मिनिटांतच आरक्षण पूर्ण झाल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा आली. यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांच्या नजरा आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांकडे लागल्या आहेत. अद्याप रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नसल्याने आमदार पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात आमदार पाटील यांनी कोकणवासीयांच्या व्यथा मांडल्या आहेत. दरम्यान, दलालांमुळे चाकरमान्यांची कोकणची वाट आणखी बिकट होत चालली आहे. 

दलालांच्या हातात सर्व आरक्षण यंत्रणारेल्वे मंत्रालय याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा तोडगा काढत नाही. दलालांच्या हातात सर्व आरक्षण यंत्रणा असून, परराज्यातून सर्रास तिकीट बुक होतात. सर्व रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घेऊन नवीन गाड्यांचे नियोजन आताच करून गौरी गणपतीनिमित्त जाणाऱ्या सर्व भाविकांना आरक्षण मिळवून द्यावे आणि कोकणवासीयांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी आमदार पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेGaneshotsavगणेशोत्सवRaju Patilराजू पाटील