शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

गणेशोत्सवासाठी रेल्वेने जायचे कसे, तुम्हीच सांगा...तिकिटांचा आढावा घ्या : आ. राजू पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 08:13 IST

गणपतीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या हजारो मुंबईकर चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा आधार असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : गणरायाच्या आगमनाच्या दोन दिवस आधीचे म्हणजेच १७ सप्टेंबरचे रेल्वेचे आरक्षण शुक्रवारी अवघ्या काही मिनिटांत फुल्ल झाले. कोकण रेल्वे व कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या रेल्वेगाड्यांत आता या दिवसाचे एकही आरक्षित तिकीट शिल्लक नाही. गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली असताना दलालांमुळे यंदाही कोकणची वाट बिकटच ठरणार आहे. या आरक्षित तिकिटांचा आढावा घ्यावा आणि कोकणवासीयांसाठी नवीन गाड्यांचे नियोजन करून कोकणवासीयांच्या कोकण प्रवासाचा ‘श्री गणेशा’ करण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली. 

गणपतीत कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या या हजारो मुंबईकर चाकरमान्यांसाठी महत्त्वाचा आधार असतात. १७ सप्टेंबर या प्रवासाच्या तारखेच्या १२० दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले होते. पहिल्याच दिवशी अवघ्या तीन मिनिटांतच आरक्षण पूर्ण झाल्याने चाकरमान्यांच्या पदरी निराशा आली. यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांच्या नजरा आता गणपती विशेष रेल्वे गाड्यांकडे लागल्या आहेत. अद्याप रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची घोषणा झालेली नसल्याने आमदार पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात आमदार पाटील यांनी कोकणवासीयांच्या व्यथा मांडल्या आहेत. दरम्यान, दलालांमुळे चाकरमान्यांची कोकणची वाट आणखी बिकट होत चालली आहे. 

दलालांच्या हातात सर्व आरक्षण यंत्रणारेल्वे मंत्रालय याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा तोडगा काढत नाही. दलालांच्या हातात सर्व आरक्षण यंत्रणा असून, परराज्यातून सर्रास तिकीट बुक होतात. सर्व रेल्वेगाड्यांच्या आरक्षणाचा आढावा घेऊन नवीन गाड्यांचे नियोजन आताच करून गौरी गणपतीनिमित्त जाणाऱ्या सर्व भाविकांना आरक्षण मिळवून द्यावे आणि कोकणवासीयांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी आमदार पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेGaneshotsavगणेशोत्सवRaju Patilराजू पाटील