शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

घरात पावसाचे पाणी साचले; संतप्त नागरिकासह माजी नगरसेवकाचे पाण्यातच ठिय्या आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 18:54 IST

आडीवली ढोकली परिसरात पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात शिरले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले असले तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.

कल्याण-गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकली परिसरातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी साचले आहे. तसेच रस्ते देखील जलमय झाले आहे. याकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ स्थानिक माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी संतप्त नागरीकांसह साचलेल्या पाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या निषेधार्थ नागरीकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

    आडीवली ढोकली परिसरात पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात शिरले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले असले तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. पावसामुळे या परिसरातील रस्ते खराब झाले आहे. खराब झालेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहे. या खड्डेमय रस्त्यातून मार्गक्रमण करताना नागरीकांना अपघाताचा सामना करावा लागतो आहे. प्रशासनाने केलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल घेत नाही तर यापूढे कल्याण शिळ रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा नगरसेवक पाटील यांनी दिला आहे. 

    या परिसरात राहणा:या एका संतप्त गृहिणीने तिची व्यथा माडंली की, तिच्या घरात तीन दिवसापासून पावसाचे पाणी शिरले आहे. घरातील टीव्ही, फ्रीज आणि अन्य इलेक्ट्रीकल्स साधने खराब झाली आहे. गटारीचे संडासाचे पाणी तिच्या घरात आहे. घरात राहयचे कसे. तिचे पती पॅरालाईसेसने आजारी आहेत. पाणी साचलेल्या खराब रस्त्यातून घरार्पयत रिक्षा येत नाही. तिची सून गरोदर आहे. आम्ही जायचे कुठे आणि राहायचे कुठे असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. 

    अन्य एका महिने सांगितले की, कर्ज काढून अंगावरील दागिने विकून आम्ही या ठिकाणी घरे घेतली आहे. आत्ता आम्ही विष खाऊन मरायचे. केवळ कोरोनाचे कारण देत महापालिका काहीच पावले उचलत नाही. केडीएमसीने काहीच उपाययोजना केल्या नाही तर आम्ही आत्महदन करु असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणRainपाऊस