शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

घरात पावसाचे पाणी साचले; संतप्त नागरिकासह माजी नगरसेवकाचे पाण्यातच ठिय्या आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 18:54 IST

आडीवली ढोकली परिसरात पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात शिरले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले असले तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.

कल्याण-गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे कल्याण पूर्व भागातील आडीवली ढोकली परिसरातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी साचले आहे. तसेच रस्ते देखील जलमय झाले आहे. याकडे कल्याण डोंबिवली महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ स्थानिक माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी संतप्त नागरीकांसह साचलेल्या पाण्यात ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रशासनाच्या निषेधार्थ नागरीकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

    आडीवली ढोकली परिसरात पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात शिरले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले असले तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. पावसामुळे या परिसरातील रस्ते खराब झाले आहे. खराब झालेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहे. या खड्डेमय रस्त्यातून मार्गक्रमण करताना नागरीकांना अपघाताचा सामना करावा लागतो आहे. प्रशासनाने केलेल्या ठिय्या आंदोलनाची दखल घेत नाही तर यापूढे कल्याण शिळ रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा इशारा नगरसेवक पाटील यांनी दिला आहे. 

    या परिसरात राहणा:या एका संतप्त गृहिणीने तिची व्यथा माडंली की, तिच्या घरात तीन दिवसापासून पावसाचे पाणी शिरले आहे. घरातील टीव्ही, फ्रीज आणि अन्य इलेक्ट्रीकल्स साधने खराब झाली आहे. गटारीचे संडासाचे पाणी तिच्या घरात आहे. घरात राहयचे कसे. तिचे पती पॅरालाईसेसने आजारी आहेत. पाणी साचलेल्या खराब रस्त्यातून घरार्पयत रिक्षा येत नाही. तिची सून गरोदर आहे. आम्ही जायचे कुठे आणि राहायचे कुठे असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. 

    अन्य एका महिने सांगितले की, कर्ज काढून अंगावरील दागिने विकून आम्ही या ठिकाणी घरे घेतली आहे. आत्ता आम्ही विष खाऊन मरायचे. केवळ कोरोनाचे कारण देत महापालिका काहीच पावले उचलत नाही. केडीएमसीने काहीच उपाययोजना केल्या नाही तर आम्ही आत्महदन करु असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणRainपाऊस