शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे महिलेला परत मिळाली दागिन्याची बॅग

By मुरलीधर भवार | Updated: December 20, 2023 20:01 IST

महात्मा फुले पोलिसांकडून रिक्षा चालक मोहन राठोड याचा सत्कार करण्यात आला आहे.

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याणमध्ये एका रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. रिक्षात एका महिलेने दागिन्याने भरलेली बॅग विसरली होती. रिक्षा चालकाने महात्मा फुले पोलिसांच्या मदतीने ती बॅग त्या महिलेस परत केली आहे. महात्मा फुले पोलिसांकडून रिक्षा चालक मोहन राठोड याचा सत्कार करण्यात आला आहे.

ठाण्यात राहणाऱ्या नम्रता देशमुख ही महिला एका लग्न सभारंभात मुरबाडला जाणार होती. त्या आधी त्या आपल्या नातेवाईकाना भेटण्याकरीता कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरात जाणार होत्या. कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरुन नम्रता यांनी चिकनघरसाठी रिक्षा पकडली त्याच्या जवळ असलेल्या तीन बॅगापैकी एक बॅग रिक्षातील सीटच्या मागे ठेवली. चिकनघर आल्यावर नम्रता दोन बॅग घेऊन खाली उतरला. त्यांना नंतर लक्षात आले की, त्यांची दागिन्याची बॅग रिक्षात विसरल्या आहे. त्या बॅगेत साडे सात तोळे सोन्याचे दागिने होते. त्यानी लगेच महात्मा फुले पोलिस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलिस निरिक्षक शैलेस साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनिल मधाळे यांनी सीसीटीव्हीत चेक केला.

या सीसीटीव्हीत रिक्षाचा नंबर सापडला. पोलिसांनी त्वरीत रिक्षा चालकास शोधून काढले. रिक्षा चालकाशी संपर्क साधला असता रिक्षा चालक मोहन राठोड याने प्रामाणिकपणे सांगितले की, ती बॅग रिक्षात आहे. मी ती बॅग महिलेला परत करण्यासाठी शाेधत होतो. या दरम्यान तुमचा फोन आला. मी ही बॅग रिक्षा युनियनच्या कार्यालयात ठेवणार होतो. याची माहिती नम्रता यांना दिली. त्यां ना पोलिस ठाण्यात बोलवून त्यांची बॅग त्यांना सूपुर्द केली. तेव्हा नम्रता यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. महिलने पोलिसांसह रिक्षा चालकाचे आभार मानले आहेत. पोलिसांनी रिक्षाचालकाचा सत्कार केला आहे.

टॅग्स :Policeपोलिस