शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस! पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेकांच्या घरात शिरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 16:00 IST

Heavy rain in Kalyan-Dombivali : वालधूनी आणि शिवाजीनगर, अशोकनगर परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी शिरले आहे. महापालिकेने वेळीच दखल घेत 100 पेक्षा जास्त कुटुंबांना पाणी शिरलेल्या भागातून अन्यत्र हलविले आहे.

कल्याण - कल्याणडोंबिवलीत गेल्या 24 तासात 177 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. तसेच पावसामुळे वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून धरणातील पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे. जोरदार पडत असलेल्या पावसामुळे वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे वालधूनी आणि शिवाजीनगर, अशोकनगर परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी शिरले आहे. महापालिकेने वेळीच दखल घेत 100 पेक्षा जास्त कुटुंबांना पाणी शिरलेल्या भागातून अन्यत्र हलविले आहे. 

कोळेगाव परिरातील घरात पाणी शिरले. त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने नागरीकांना फूड पॅकेट वाटप करण्यात आली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी भारत पवार यांनी दिली आहे. कासा रिओ येथील नाला दुथडीभरुन वाहत आहे. त्याचबरोबर नांदिवली परिसरात पाणी शिरले आहे. कल्याण स्टेशन परिसरातील महंमद अली चौक ते एसीपी कार्यालयार्पयत रस्त्यावर पाणी साचले होते. शिवाजी चौकात पाणी साचले होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 

कल्याण मुरबाड रोडवरील वरप, कांबा, म्हारळ या दरम्यान रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. कल्याण शीळ रस्त्यावरही पाणी साचले होते. या रस्त्यावरील रस्ते वाहतूकीला कोंडीचा सामना करावा लागला. कल्याण उल्हासनगर मार्गावरील वालधूनी रेल्वे उड्डाण पूलावर वाहतूक कोंडी झाली होती. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. 

दरम्यान महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रत गेल्या 24 तासात 177 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. ही अतिवृष्टी आहे. काल रात्रीपासून नागरीकांच्या घरात पाणी शिरण्याच्या काही घटना सखल भागात घडल्या आहे. त्याठिकाणच्या नागरीकांना इतत्र हलविले जात आहे. त्यांना फूड पॅकेट पुरविण्याचे काम केले जात आहे. आज रात्री नऊ वाजता भरतीची वेळ आहे. पाऊस थांबला नाही तर भरतीच्या वेळी महापालिका प्रशासन लोलाईन एरियात जास्त लक्ष ठेवणार आहे.  

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली