शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करू तेव्हा वाढेल हॅप्पीनेस इंडेक्स : नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 07:24 IST

देशातील जनतेची जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्तता करणे याचाच अर्थ ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना राबविणे आहे - गडकरी

कल्याण : देशातील जनतेची जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणातून मुक्तता करणे याचाच अर्थ ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना राबविणे आहे. ज्यावेळी आपण प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करू, त्यावेळी भारताचा हॅप्पीनेस इंडेक्स वाढेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

कल्याण जनता सहकारी बँकेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अत्रे रंगमंदिरात आयोजित सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी संघाचे कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ, बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर, उपाध्यक्ष डॉ.  रत्नाकर फाटक, अतुल  खिरवडकर, मोहन आघारकर, प्रा. अशोक प्रधान, पोस्टमास्तर जनरल गणेश सावळेश्वरकर, भाजप आ. गणपत गायकवाड, कुमार आयलानी, माजी आ. नरेंद्र पवार, आदी उपस्थित होते.

गडकरी यांच्या हस्ते मधू हब्बू आणि अमित घैसास यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हब्बू यांनी त्यांना मिळालेली पुरस्काराची रक्कम वनवासी कल्याण आश्रमाला दिल्याचे जाहीर केले. गडकरी म्हणाले की, भौतिक सुखाबरोबर समाज सुखी, समाधानी, संपन्न करायचा असल्यास जनतेला प्रदूषणातून मुक्ती दिली पाहिजे. त्यासाठी  इलेक्ट्रिक, इथेनॉल, हायड्रोजनवर चालणारी वाहने वापरात आली पाहिजे. या खात्याचा मंत्री असल्याने मीच दंडा घेऊन बसलो आहे. मुंबईत नॉन एसी इलेक्ट्रिक बस ३९ रुपये भाडे आकारते. एसी ई- बस ४१ रुपये भाडे आकारते. डिझेलवर चालणारी बस ११५ रुपये भाडे आकारते. त्यामुळे ई-बस आल्या तर ३० टक्के भाडे कमी होईल. तसेच प्रवाशांना एसी बसमधून प्रवास करता येईल.

देशातील गरीब जनतेच्या पैशांतून पायाभूत सुविधा उभ्या करायच्या आणि त्यांचे पैसे त्यांना परत करायचे, असे धोरण आहे. दरवर्षी माझ्या खात्याला पायाभूत सोयीसुविधांसाठी तीन लाख कोटी हवे आहेत. जनतेकडून हा पैसा उभा करून जनतेला आठ टक्के परतावा दिला जातो.

अनेक परदेशी कंपन्या भारताबरोबर येण्यासाठी तयार आहेत. त्याचे कारण भारताकडे संस्कृती, इतिहास आणि चारित्र्य या गोष्टी आहेत. कल्याण जनता बँकेच्या सदस्यांनी भत्ता घेणार नाही, असे जाहीर केले. या बँकेचा उत्तरोत्तर विकास होत जाईल, असे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी