शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पहिल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची पंचविशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:41 IST

डोंबिवली पूर्वेला १९९८ मध्ये मदन ठाकरे चौकात ३१ डिसेंबर साजरा करण्यात आला.

- प्रवीण दुधे, (कार्यवाह, गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली)

गेल्या काही वर्षांत ३१ डिसेंबर, व्हॅलेंटाइन डेचे वाढते प्रस्थ पाहता हिंदू संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे. या पाश्चिमात्य संस्कृतीच्या पगड्याला विरोध न करता एखादा पर्याय द्यावा, या उदात्त हेतूने श्री गणेश मंदिर संस्थानाने गुढी पाडव्याचे औचित्य साधत हिंदू नववर्षानिमित्त लोकसहभागातून स्वागतयात्रेची संकल्पना उदयास आणली. केवळ मिरवणूक काढून नववर्षाचे स्वागत करणे हा स्वागतयात्रेचा मूळ उद्देश न राहता त्यातून संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच विविध उपक्रम आणि सामाजिक संदेशाद्वारे बांधीलकी जपली आहे. १९९९ ला प्रारंभ झालेल्या या ‘गावकीच्या उत्सवाचे’ यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.

डोंबिवली पूर्वेला १९९८ मध्ये मदन ठाकरे चौकात ३१ डिसेंबर साजरा करण्यात आला. डोंबिवलीकर प्रेमी आणि सामाजिक जाण असलेल्यांनी तो प्रकार पाहिला. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, मधुकर चक्रदेव आणि सुरेंद्र वाजपेयी यांच्यापर्यंत ही घटना पोहोचली. ३१ डिसेंबरचे प्रस्थ वाढत गेले तर शहराचे चित्र पालटू शकते, अशी भीती त्यावेळी व्यक्त झाली. दत्तनगरमध्ये बैठक झाली. ३१ डिसेंबर या पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण पाहता वेगळा पर्याय देणे आवश्यक असल्याने ‘हिंदू नववर्षाची स्वागतयात्रा’ ही संकल्पना सुरू करण्याचा विचार मांडण्यात आला. उपक्रम सर्वसमावेशक असला पाहिजे, यात राजकीय तसेच कोणत्याही ज्ञातिभावना येऊ नये याकडेही लक्ष वेधले गेले. उपक्रमाचे प्रतिनिधित्व श्री गणेश मंदिर संस्थानने करावे, असाही निर्णय झाला.

दांडगा लोकसंपर्क असलेले आबासाहेब पटवारी हे त्यावेळी श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष होते. अन्य विश्वस्तांची बैठक झाली आणि स्वागतयात्रेच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली. शहरातील सर्व धार्मिक संस्थांना, सांप्रदायांनाही आवाहन पत्रके वाटण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही संकल्पना पोहोचावी म्हणून शहरातील शैक्षणिक संस्थांची मदत घेण्यात आली. बालगोपाळांना आकर्षण वाटावे म्हणून नववर्षाच्या पूर्वसंध्येला आतषबाजी आयोजित करण्यात आली. हजारो नागरिकांच्या सहभागाने वेगवेगळ्या विषयांवरील चित्ररथांनी, कलापथके आणि मेळ्यांनी निघणारी नववर्ष स्वागत शोभायात्रा आजही शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे. 

गेल्या २४ वर्षांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, दिग्दर्शक राजदत्त, माजी सरसंघचालक के. सुदर्शन, पुणे पीठाचे स्वामी स्वरूपानंद, साध्वी ऋतुंबरा, अभिनेते मोहन जोशी, आयपीएस अधिकारी वाय. सी. पवार, दा. कृ. सोमण यांच्यासह इतर महनीय व्यक्तींनी उपस्थिती लावली आहे. स्वागतयात्रेचे यंदाचे वर्ष रौप्यमहोत्सवी आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आजवरच्या सर्व विश्वस्तांचे मोठे योगदान लाभले आहे. 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाMumbaiमुंबई