शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

पहिल्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची पंचविशी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:41 IST

डोंबिवली पूर्वेला १९९८ मध्ये मदन ठाकरे चौकात ३१ डिसेंबर साजरा करण्यात आला.

- प्रवीण दुधे, (कार्यवाह, गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली)

गेल्या काही वर्षांत ३१ डिसेंबर, व्हॅलेंटाइन डेचे वाढते प्रस्थ पाहता हिंदू संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे. या पाश्चिमात्य संस्कृतीच्या पगड्याला विरोध न करता एखादा पर्याय द्यावा, या उदात्त हेतूने श्री गणेश मंदिर संस्थानाने गुढी पाडव्याचे औचित्य साधत हिंदू नववर्षानिमित्त लोकसहभागातून स्वागतयात्रेची संकल्पना उदयास आणली. केवळ मिरवणूक काढून नववर्षाचे स्वागत करणे हा स्वागतयात्रेचा मूळ उद्देश न राहता त्यातून संस्कृतीचे जतन करण्याबरोबरच विविध उपक्रम आणि सामाजिक संदेशाद्वारे बांधीलकी जपली आहे. १९९९ ला प्रारंभ झालेल्या या ‘गावकीच्या उत्सवाचे’ यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.

डोंबिवली पूर्वेला १९९८ मध्ये मदन ठाकरे चौकात ३१ डिसेंबर साजरा करण्यात आला. डोंबिवलीकर प्रेमी आणि सामाजिक जाण असलेल्यांनी तो प्रकार पाहिला. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, मधुकर चक्रदेव आणि सुरेंद्र वाजपेयी यांच्यापर्यंत ही घटना पोहोचली. ३१ डिसेंबरचे प्रस्थ वाढत गेले तर शहराचे चित्र पालटू शकते, अशी भीती त्यावेळी व्यक्त झाली. दत्तनगरमध्ये बैठक झाली. ३१ डिसेंबर या पाश्चिमात्य संस्कृतीचे आक्रमण पाहता वेगळा पर्याय देणे आवश्यक असल्याने ‘हिंदू नववर्षाची स्वागतयात्रा’ ही संकल्पना सुरू करण्याचा विचार मांडण्यात आला. उपक्रम सर्वसमावेशक असला पाहिजे, यात राजकीय तसेच कोणत्याही ज्ञातिभावना येऊ नये याकडेही लक्ष वेधले गेले. उपक्रमाचे प्रतिनिधित्व श्री गणेश मंदिर संस्थानने करावे, असाही निर्णय झाला.

दांडगा लोकसंपर्क असलेले आबासाहेब पटवारी हे त्यावेळी श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष होते. अन्य विश्वस्तांची बैठक झाली आणि स्वागतयात्रेच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली. शहरातील सर्व धार्मिक संस्थांना, सांप्रदायांनाही आवाहन पत्रके वाटण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही संकल्पना पोहोचावी म्हणून शहरातील शैक्षणिक संस्थांची मदत घेण्यात आली. बालगोपाळांना आकर्षण वाटावे म्हणून नववर्षाच्या पूर्वसंध्येला आतषबाजी आयोजित करण्यात आली. हजारो नागरिकांच्या सहभागाने वेगवेगळ्या विषयांवरील चित्ररथांनी, कलापथके आणि मेळ्यांनी निघणारी नववर्ष स्वागत शोभायात्रा आजही शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे. 

गेल्या २४ वर्षांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, दिग्दर्शक राजदत्त, माजी सरसंघचालक के. सुदर्शन, पुणे पीठाचे स्वामी स्वरूपानंद, साध्वी ऋतुंबरा, अभिनेते मोहन जोशी, आयपीएस अधिकारी वाय. सी. पवार, दा. कृ. सोमण यांच्यासह इतर महनीय व्यक्तींनी उपस्थिती लावली आहे. स्वागतयात्रेचे यंदाचे वर्ष रौप्यमहोत्सवी आहे. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी आजवरच्या सर्व विश्वस्तांचे मोठे योगदान लाभले आहे. 

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाMumbaiमुंबई