शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

पीएम स्वनिधीला राष्ट्रीयीकृत बँकांकडून खोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 01:10 IST

Dombivali News : राष्ट्रीयीकृत बँकांच्या नियोजनशून्य आणि उदासीन कारभारात थोड्याच फेरीवाल्यांना या कर्जयोजनेचा लाभ मिळाल्याने पीएम स्वनिधीला राष्ट्रीयीकृत बँकांचा खोडा बसल्याचे स्पष्ट होत आहे.

- प्रशांत मानेकल्याण :  कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीत रोजगार बुडाल्याने रोजंदारी करणाऱ्यांना कर्ज स्वरूपात आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली. रस्त्यावर ठेला लावणाऱ्या फेरीवाल्यांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिका स्तरावर ही योजना राबविण्यात आली. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांच्या नियोजनशून्य आणि उदासीन कारभारात थोड्याच फेरीवाल्यांना या कर्जयोजनेचा लाभ मिळाल्याने पीएम स्वनिधीला राष्ट्रीयीकृत बँकांचा खोडा बसल्याचे स्पष्ट होत आहे.केडीएमसीच्या २०१४ मध्ये झालेल्या फेरीवाला विभागाच्या सर्वेक्षणात नऊ हजार ७३ फेरीवाल्यांची नोंद झाली आहे. महापालिकेच्या वतीने १० प्रभाग क्षेत्रांमध्ये राबवलेल्या पीएम स्वनिधी योजनेतून १४ हजार ९७० फेरीवाल्यांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट केंद्राने दिले होते. पालिकेने सर्व्हेत सहा हजार ६०१ फेरीवाल्यांचे अर्ज आले. त्यातील दाेन हजार ५९७ जणांचे अर्ज मंजूर झाले. यात दाेन हजार १९१ जणांचे अर्ज मंजूर केले असून एक हजार १९८ जणांनाच १० हजार रुपये कर्जाचा लाभ झाला.बँकांचे मौनबँकांवर कर्ज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी होती. पण आमच्याकडे कर्मचारी नाहीत. आमची बँक दुसऱ्या बँकेत विलीन होणार आहे अशी सबब देऊन बँका टाळाटाळ करीत होत्या. तसेच क्षुल्लक कारणावरून अर्ज नामंजूर केले जात होते, अशा तक्रारी फेरीवाल्यांच्या होत्या. याबाबत मात्र काहीही भाष्य करण्यास राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दिला आहे. अर्ज करूनही कर्ज न मिळाल्याने झाला अपेक्षाभंग ! लॉकडाऊनमध्ये रोजगार पूर्णपणे बुडाल्याने उपासमारीची वेळ कुटुंबावर ओढावली. धंदा पुन्हा करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. पीएम स्वनिधीच्या माध्यमातून थोडाफार हातभार लागेल, अशी अपेक्षा होती. पण, अर्ज करूनही कर्ज उपलब्ध न झाल्याने अपेक्षा फोल ठरली आहे.- राजू गुप्ता, फेरीवालामहापालिकेकडून अर्ज भरून घेण्यात आले. पण बँकेच्या आडमुठ्या धोरणामुळे कर्ज उपलब्ध होऊ शकले नाही. दरम्यान अर्थसाहाय्य मिळण्यासाठी ही योजना फायदेशीर होती. कर्ज फेडण्याचे जे नियम दिले होते ते सोयीस्कर नव्हते, त्यामुळे आम्हा फेरीवाल्यांचा पुरता हिरमोड झाला आहे.- संजय चव्हाण, फेरीवाला पीएम स्वनिधी योजनेतून अर्ज करूनही आजतागायत कर्ज मंजूर झालेले नाही. लॉकडाऊनमध्ये एकूणच झालेले नुकसान पाहता कर्जाची रक्कम १० हजारांहून अधिक असणे गरजेचे होते. पण आजच्या घडीला १० हजारांचे कर्जही मिळू शकलेले नाही.- परेश जाधव,  फेरीवाला

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBanking Sectorबँकिंग क्षेत्र