शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

केडीएमसीच्या बारावे घनकचरा कचरा प्रकल्पातील कचऱ्याला आग

By मुरलीधर भवार | Updated: April 5, 2023 15:47 IST

बारावे कचरा प्रकल्पात सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. आज दुपारी कचऱ्याला आग लागल्याने आगीने लगेच राैद्र रुप धारण केले.

कल्याण-शहरातील पश्चिम भागातील कल्याण डाेंबिवली महापालिकेच्या बारावे घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला आज दुपारी आग लागल्याने या परिसरात धुराचे साम्राज्य पसरले हाेते. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट हाेऊ शकले नाही. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ३ तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्नीशमन दलाला यश आले. 

बारावे कचरा प्रकल्पात सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. आज दुपारी कचऱ्याला आग लागल्याने आगीने लगेच राैद्र रुप धारण केले. आगीमुळे परिसरात धूर पसरला हाेता. हा धूर आसपास राहणाऱ्या नागरीकांच्या नाका ताेंडात गेल्याने नागरीकांना त्रास झाला. आग लागल्याची माहिती मिळताच आग विझविण्यासाठी घटना स्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. 

१० मार्चला रात्रीच्या सुमारास बारावे कचरा प्रकल्पास आग लागल्याची घटना घडली हाेती. ती आगही माेठी हाेती. आगीचा धूर ११ मार्चपर्यंत परिसरात धुमसत हाेता. त्यानंतर पुन्हा आज प्रकल्पातील कचऱ्याने पेट घेतला. आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट हाेत नसले तरी आग लागली की लावली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

बारावे कचरा प्रकल्पात कचऱ्यापासून खत तयार करण्याची प्रक्रिया केली जात असली तरी त्याठिकाणी प्रकल्पाच्या क्षमतेपक्षा जास्त कचरा साठविला जाताे. त्यामुळे त्याठिकाणी कचऱ्यावर याेग्य प्रकारे प्रक्रिया केली जात नाही. प्रकल्पावर ताण येत आहे. उन्हाळ्यात साचलेल्या कचऱ्यात मिथेन वायू तयार हाेऊ आपाेआप आग लागण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहे. या कारणामुळेही आग लागली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :fireआग