शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

'बाळासाहेबांनी धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 14:41 IST

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पत्रकारांशी बोलताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी डोंबिवलीतील कार्यक्रमात खंत व्यक्त केली.

प्रशांत माने

डोंबिवली: सरसेनापती बाळासाहेबांनी ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याच्या जोरावर महाराष्ट्रामधील अनेक सत्ता केंद्रांवर त्यांनी सत्ता मिळवली. राज्य सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले. ही वर्षानुवर्षाची पुण्याई आहे ती दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही, हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावरच समजेल. परंतु, तात्पुरते का होईना निवडणूक चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक आहे अशी खंत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पत्रकारांशी बोलताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी डोंबिवलीतील कार्यक्रमात व्यक्त केली.

आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने लेवा पाटील समाजातील लेखक खेमचंद पाटील लिखित ‘लेवा साहित्यिक रत्ने’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व लेवा साहित्यिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्र माला माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे उपस्थित होते. शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह गोठवल्याच्या मुद्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावर पुणे पोलिसांकडून सादर झालेल्या क्लोजर रिपोर्टवर देखील भाष्य केले. रश्मी शुक्ला ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या. त्याच दिवशीच त्यांना क्लीन चीट मिळेल असं वाटलं होते. माझाही फोन ६८ दिवस टॅप करण्यात आला होता तो कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आला याची अजूनही मला कल्पना देण्यात आलेली नाही. एफआर दाखल झालेला आहे चौकशी सुरू आहे असे सांगण्यात येते. शुक्ला त्या कालखंडात प्रमुख होत्या म्हणून त्यांना जबाबदार धरण्यात आले होते आता त्यांना क्लीन चीट दिलेली आहे त्यामुळे आता या केसचं भवितव्य अंधारात आहे असल्याचे खडसे म्हणाले. या कार्यक्रमाला व्याकरणाचार्य भक्तिकिशोर शास्त्री यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

नियम घटनेचा चोळामोळा - चौधरी

केंद्रातील यंत्रणांनी कायदा आणि नियम घटनेचा चोळामोळा करायचा ठरवल असेल तर काय बोलायचे असे प्रतिपादन काँग्रेसचे रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी केले. केंद्राकडून या देशाची घटना तसेच स्वायत्त यंत्रणा देखील चोळामोळा करून पायाखाली रगडायचं काम जर सुरू असेल तर देशाच्या जनतेने याचा विचार करावा असे चौधरी म्हणाले. दरम्यान चौधरी यांनी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याबाबत आमचे वरीष्ठ नेते प्रतिक्रिया देतील असे सांगत त्यावर बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाeknath khadseएकनाथ खडसेUddhav Thackerayउद्धव ठाकरे