शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'बाळासाहेबांनी धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 14:41 IST

शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पत्रकारांशी बोलताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी डोंबिवलीतील कार्यक्रमात खंत व्यक्त केली.

प्रशांत माने

डोंबिवली: सरसेनापती बाळासाहेबांनी ज्या धनुष्यबाणाला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याच्या जोरावर महाराष्ट्रामधील अनेक सत्ता केंद्रांवर त्यांनी सत्ता मिळवली. राज्य सरकारमध्ये त्यांचे मुख्यमंत्री झाले. ही वर्षानुवर्षाची पुण्याई आहे ती दोघांच्या भांडणांमध्ये गोठवली गेली, यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. याला कोण जबाबदार आहे, कोण नाही, हे तर निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावरच समजेल. परंतु, तात्पुरते का होईना निवडणूक चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक आहे अशी खंत शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर पत्रकारांशी बोलताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी डोंबिवलीतील कार्यक्रमात व्यक्त केली.

आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने लेवा पाटील समाजातील लेखक खेमचंद पाटील लिखित ‘लेवा साहित्यिक रत्ने’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व लेवा साहित्यिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्र माला माजी महसूल मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे उपस्थित होते. शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह गोठवल्याच्या मुद्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणावर पुणे पोलिसांकडून सादर झालेल्या क्लोजर रिपोर्टवर देखील भाष्य केले. रश्मी शुक्ला ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या. त्याच दिवशीच त्यांना क्लीन चीट मिळेल असं वाटलं होते. माझाही फोन ६८ दिवस टॅप करण्यात आला होता तो कोणत्या कारणासाठी टॅप करण्यात आला याची अजूनही मला कल्पना देण्यात आलेली नाही. एफआर दाखल झालेला आहे चौकशी सुरू आहे असे सांगण्यात येते. शुक्ला त्या कालखंडात प्रमुख होत्या म्हणून त्यांना जबाबदार धरण्यात आले होते आता त्यांना क्लीन चीट दिलेली आहे त्यामुळे आता या केसचं भवितव्य अंधारात आहे असल्याचे खडसे म्हणाले. या कार्यक्रमाला व्याकरणाचार्य भक्तिकिशोर शास्त्री यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

नियम घटनेचा चोळामोळा - चौधरी

केंद्रातील यंत्रणांनी कायदा आणि नियम घटनेचा चोळामोळा करायचा ठरवल असेल तर काय बोलायचे असे प्रतिपादन काँग्रेसचे रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी यांनी केले. केंद्राकडून या देशाची घटना तसेच स्वायत्त यंत्रणा देखील चोळामोळा करून पायाखाली रगडायचं काम जर सुरू असेल तर देशाच्या जनतेने याचा विचार करावा असे चौधरी म्हणाले. दरम्यान चौधरी यांनी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्याबाबत आमचे वरीष्ठ नेते प्रतिक्रिया देतील असे सांगत त्यावर बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाeknath khadseएकनाथ खडसेUddhav Thackerayउद्धव ठाकरे