शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

...तर मी पेट्रोल टाकून आत्मदहन करेन; पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असल्याने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 13:03 IST

ग्रामीण भागातील सांगाव, सागरली  तसेच इतर गावात  पाण्याचा नियमित पुरवठा केला जात नाही असा आरोप  नागरिक करत आहेत.

डोंबिवली: कल्याणडोंबिवली शहरानजीक असलेल्या 27  गावांमध्ये पाणी  टंचाईचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी कपातीसोबत  बहुतांश ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. रोज नागरिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात जाऊन याबाबत जाब विचारत आहेत. मात्र, केडीएमसी आणि  एमआयडीसी प्रशासनाच्या  ढिसाळ कारभारामुळे लोकप्रतिनिधींची पंचाईत झाली आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा इशारा  भाजपाच्या माजी नगरसेविका सुनीता पाटील यांनी दिला आहे. 

ग्रामीण भागातील सांगाव, सागरली  तसेच इतर गावात  पाण्याचा नियमित पुरवठा केला जात नाही असा आरोप  नागरिक करत आहेत. संतप्त नागरिकांनी अनेकदा याबाबत मोर्चे आणि आंदोलनं करण्याचे ठरविले. मात्र कोरोनाचा काळ लक्षात घेता मी त्यांची समजूत काढली असे सुनीता पाटील।यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

एमआयडीसीला जाब विचारल्यावर , पालिकेकडे आमची भरपूर थकबाकी आहे असे सांगण्यात येते. पालिका आणि एमआयडीसी यांच्यात योग्य तो  समन्वय नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे असेही पाटील म्हणाल्या.  पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला नाही तर आत्मदहन करू अशा आशयाचे पत्र  त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाBJPभाजपा