शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

...तर मी पेट्रोल टाकून आत्मदहन करेन; पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असल्याने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 13:03 IST

ग्रामीण भागातील सांगाव, सागरली  तसेच इतर गावात  पाण्याचा नियमित पुरवठा केला जात नाही असा आरोप  नागरिक करत आहेत.

डोंबिवली: कल्याणडोंबिवली शहरानजीक असलेल्या 27  गावांमध्ये पाणी  टंचाईचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी कपातीसोबत  बहुतांश ठिकाणी कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. रोज नागरिक लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात जाऊन याबाबत जाब विचारत आहेत. मात्र, केडीएमसी आणि  एमआयडीसी प्रशासनाच्या  ढिसाळ कारभारामुळे लोकप्रतिनिधींची पंचाईत झाली आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा इशारा  भाजपाच्या माजी नगरसेविका सुनीता पाटील यांनी दिला आहे. 

ग्रामीण भागातील सांगाव, सागरली  तसेच इतर गावात  पाण्याचा नियमित पुरवठा केला जात नाही असा आरोप  नागरिक करत आहेत. संतप्त नागरिकांनी अनेकदा याबाबत मोर्चे आणि आंदोलनं करण्याचे ठरविले. मात्र कोरोनाचा काळ लक्षात घेता मी त्यांची समजूत काढली असे सुनीता पाटील।यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

एमआयडीसीला जाब विचारल्यावर , पालिकेकडे आमची भरपूर थकबाकी आहे असे सांगण्यात येते. पालिका आणि एमआयडीसी यांच्यात योग्य तो  समन्वय नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे असेही पाटील म्हणाल्या.  पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाला नाही तर आत्मदहन करू अशा आशयाचे पत्र  त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाBJPभाजपा