शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा विसर, मनसेच्या राजू पाटलांचं मुख्यमंत्र्यांना ‘आगरी भाषेत’ पत्र

By प्रशांत माने | Updated: September 12, 2023 16:38 IST

लाेकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळास नाव देण्यात यावे यासाठी आगरी कोळी समाजाने मोठा लढा उभारला. या लढ्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली.

डोंबिवली: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला विधीमंडळाने मंजूरी दिली आहे. मात्र हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विसर पडल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. दरम्यान त्याचे स्मरण करुन देण्यासाठी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना चक्क आगरी भाषेत पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिलेले आगरी भाषेतील पत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

लाेकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळास नाव देण्यात यावे यासाठी आगरी कोळी समाजाने मोठा लढा उभारला. या लढ्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. विधी मंडळात २५ ऑगस्ट २०२२ ला दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र विधी मंडळाने मंजूर केलेला ठराव अद्याप केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही. या मुद्यावर मुख्यमंत्री शिंदे यांना आगरी भाषेत दिलेल्या पत्रात मनसेचे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री आपण नेहमी दिल्लीत जातात. आमच्या दि. बा. पाटील यांच्या नावाची फाईल नेणे तुम्हाला जड नाही. ‘भरले गारीला सूप जर नसंत’ अशा शब्दात त्यांनी आगरी म्हणीचा वापर करुन लक्ष वेधले आहे.

समाज बांधव विमानतळाच्या ठिकाणी दि. बा. पाटील यांच्या नावाची पाटी लागावी असे स्वप्न पाहत आहेत. ज्या समाज बांधवांनी मोठे जन आंदोलन उभे केले. त्याच बांधवांच्या मनात दि.बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राकडे न पाठविल्याने विस्तव पेटू शकतो. त्यामुळे ‘हात्ती गेला अन शेपूट रला’ अशी म्हण वापरत मुख्यमंत्र्यांना नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची आठवण पत्रप्रपंचाद्वारे पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे