शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा विसर, मनसेच्या राजू पाटलांचं मुख्यमंत्र्यांना ‘आगरी भाषेत’ पत्र

By प्रशांत माने | Updated: September 12, 2023 16:38 IST

लाेकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळास नाव देण्यात यावे यासाठी आगरी कोळी समाजाने मोठा लढा उभारला. या लढ्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली.

डोंबिवली: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला विधीमंडळाने मंजूरी दिली आहे. मात्र हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विसर पडल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. दरम्यान त्याचे स्मरण करुन देण्यासाठी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना चक्क आगरी भाषेत पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिलेले आगरी भाषेतील पत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

लाेकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळास नाव देण्यात यावे यासाठी आगरी कोळी समाजाने मोठा लढा उभारला. या लढ्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. विधी मंडळात २५ ऑगस्ट २०२२ ला दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र विधी मंडळाने मंजूर केलेला ठराव अद्याप केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही. या मुद्यावर मुख्यमंत्री शिंदे यांना आगरी भाषेत दिलेल्या पत्रात मनसेचे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री आपण नेहमी दिल्लीत जातात. आमच्या दि. बा. पाटील यांच्या नावाची फाईल नेणे तुम्हाला जड नाही. ‘भरले गारीला सूप जर नसंत’ अशा शब्दात त्यांनी आगरी म्हणीचा वापर करुन लक्ष वेधले आहे.

समाज बांधव विमानतळाच्या ठिकाणी दि. बा. पाटील यांच्या नावाची पाटी लागावी असे स्वप्न पाहत आहेत. ज्या समाज बांधवांनी मोठे जन आंदोलन उभे केले. त्याच बांधवांच्या मनात दि.बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राकडे न पाठविल्याने विस्तव पेटू शकतो. त्यामुळे ‘हात्ती गेला अन शेपूट रला’ अशी म्हण वापरत मुख्यमंत्र्यांना नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची आठवण पत्रप्रपंचाद्वारे पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे