शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा विसर, मनसेच्या राजू पाटलांचं मुख्यमंत्र्यांना ‘आगरी भाषेत’ पत्र

By प्रशांत माने | Updated: September 12, 2023 16:38 IST

लाेकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळास नाव देण्यात यावे यासाठी आगरी कोळी समाजाने मोठा लढा उभारला. या लढ्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली.

डोंबिवली: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला विधीमंडळाने मंजूरी दिली आहे. मात्र हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याच्या कामाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विसर पडल्याचा आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. दरम्यान त्याचे स्मरण करुन देण्यासाठी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना चक्क आगरी भाषेत पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिलेले आगरी भाषेतील पत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

लाेकनेते दि. बा. पाटील यांचे विमानतळास नाव देण्यात यावे यासाठी आगरी कोळी समाजाने मोठा लढा उभारला. या लढ्याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागली. विधी मंडळात २५ ऑगस्ट २०२२ ला दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र विधी मंडळाने मंजूर केलेला ठराव अद्याप केंद्र सरकारकडे पाठविलेला नाही. या मुद्यावर मुख्यमंत्री शिंदे यांना आगरी भाषेत दिलेल्या पत्रात मनसेचे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री आपण नेहमी दिल्लीत जातात. आमच्या दि. बा. पाटील यांच्या नावाची फाईल नेणे तुम्हाला जड नाही. ‘भरले गारीला सूप जर नसंत’ अशा शब्दात त्यांनी आगरी म्हणीचा वापर करुन लक्ष वेधले आहे.

समाज बांधव विमानतळाच्या ठिकाणी दि. बा. पाटील यांच्या नावाची पाटी लागावी असे स्वप्न पाहत आहेत. ज्या समाज बांधवांनी मोठे जन आंदोलन उभे केले. त्याच बांधवांच्या मनात दि.बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राकडे न पाठविल्याने विस्तव पेटू शकतो. त्यामुळे ‘हात्ती गेला अन शेपूट रला’ अशी म्हण वापरत मुख्यमंत्र्यांना नावाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची आठवण पत्रप्रपंचाद्वारे पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे