शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

कल्याणमधील बारावे कचरा प्रकल्पास लागली आग, अग्नीशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्यात यश

By मुरलीधर भवार | Updated: April 11, 2024 19:04 IST

बारावे येथे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या ठिकणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.

कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील बारावे येथील घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी २ वाजता घडली. ही माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्याचे काम सुरु केले. तीन तासात अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. आग विझविण्याकरीता पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

बारावे येथे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या ठिकणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. या ठिकाणी साठवणूक केलेल्या कचऱ्याला आज दुपारी आग लागली. आगीमुळे धुराचे लोट सगळीकडे पसरले. प्रकल्पाच्या नजीकच्या रहिवासी साेसायट्यांमध्ये नागरीकांच्या नाका तोंडात धूर गेल्याने नागरीकांचा जीव कासावीस झाला. भर दुपारी ही घटना घडल्याने आधीच उन्हाचा तडाखा त्यात धूराचा त्रास अशा दुहेरी त्रासाला नागरीकांना तोंड द्यावे लागले.

अग्नीशमन दलाचे मुख्य अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले की, या प्रकल्पातील कचऱ्याला दहा दिवसापूर्वी आग लागल्याची घटना घडली होती. त्या आगीची धग कुठे शिल्लक असल्यास त्यामुळे आग लागली असावी अशी शक्यता आहे. तसेच उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढल्यावर कचऱ्याच्या ढिगाखाली मिथून वायू तयार होऊन कचरा आपोआप पेट घेतो. त्यामुळेही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे यांनी सांगितले की, बाारवे प्रकल्पात कचरा प्रक्रिया करण्याऐवजी त्याठिकाणी कचरा साठविला जातो. त्याठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही. त्यामुळे हा प्रकल्प नागरीकांकरीता शाप ठरत आहे. दहा दिवसापूर्वी या प्रकल्पास आग लागली होती. ती शांत होत नाही. तोच आज पुन्हा आग लागली. मागच्या वर्षी भर उन्हाळ्यात अशा प्रकारची मोठी आग प्रकल्पातील कचऱ्याला लागली होती. आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहे. त्याबाबत महापालिका प्रशासन गांभीर्याने घेत नाही. कल्याण पूर्वे, डोंबिवली पूर्व पश्चिम आणि टिटवाळा आंबिवलीसह २७ गावातील कचरा प्प्रकल्पात आणून टाकला जात आहे. वास्तविक पाहता ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो. त्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे असा नियम आहे.

हा नियम धाब्यावर बसविला जातो. तसेच महापालिका आेल्या कचऱ्यावरील प्रक्रियेकरीता १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबविणार होती. त्यापैकी कैवळ चार ठिकाणी बायोगॅस प्रकल्प सुरु करण्यात आलेले आहे. उर्वरीत प्रकल्प कधी राबविणार आहे असा सवाल घेगडे यांनी उपस्थित केला आहे. या शिवाय वेस्ट टू एनर्जी -कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प राबविण्याच्या बाता केवळ महापालिका प्रशासनाकडून झोडल्या जात आहे. तो प्रकल्प ही कधी अस्तित्वात येणार याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दल