शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कल्याणमधील बारावे कचरा प्रकल्पास लागली आग, अग्नीशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्यात यश

By मुरलीधर भवार | Updated: April 11, 2024 19:04 IST

बारावे येथे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या ठिकणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.

कल्याण-शहराच्या पश्चिम भागातील बारावे येथील घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना आज दुपारी २ वाजता घडली. ही माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझविण्याचे काम सुरु केले. तीन तासात अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. आग विझविण्याकरीता पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

बारावे येथे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. या ठिकणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. या ठिकाणी साठवणूक केलेल्या कचऱ्याला आज दुपारी आग लागली. आगीमुळे धुराचे लोट सगळीकडे पसरले. प्रकल्पाच्या नजीकच्या रहिवासी साेसायट्यांमध्ये नागरीकांच्या नाका तोंडात धूर गेल्याने नागरीकांचा जीव कासावीस झाला. भर दुपारी ही घटना घडल्याने आधीच उन्हाचा तडाखा त्यात धूराचा त्रास अशा दुहेरी त्रासाला नागरीकांना तोंड द्यावे लागले.

अग्नीशमन दलाचे मुख्य अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले की, या प्रकल्पातील कचऱ्याला दहा दिवसापूर्वी आग लागल्याची घटना घडली होती. त्या आगीची धग कुठे शिल्लक असल्यास त्यामुळे आग लागली असावी अशी शक्यता आहे. तसेच उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढल्यावर कचऱ्याच्या ढिगाखाली मिथून वायू तयार होऊन कचरा आपोआप पेट घेतो. त्यामुळेही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे यांनी सांगितले की, बाारवे प्रकल्पात कचरा प्रक्रिया करण्याऐवजी त्याठिकाणी कचरा साठविला जातो. त्याठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही. त्यामुळे हा प्रकल्प नागरीकांकरीता शाप ठरत आहे. दहा दिवसापूर्वी या प्रकल्पास आग लागली होती. ती शांत होत नाही. तोच आज पुन्हा आग लागली. मागच्या वर्षी भर उन्हाळ्यात अशा प्रकारची मोठी आग प्रकल्पातील कचऱ्याला लागली होती. आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहे. त्याबाबत महापालिका प्रशासन गांभीर्याने घेत नाही. कल्याण पूर्वे, डोंबिवली पूर्व पश्चिम आणि टिटवाळा आंबिवलीसह २७ गावातील कचरा प्प्रकल्पात आणून टाकला जात आहे. वास्तविक पाहता ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो. त्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली पाहिजे असा नियम आहे.

हा नियम धाब्यावर बसविला जातो. तसेच महापालिका आेल्या कचऱ्यावरील प्रक्रियेकरीता १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प राबविणार होती. त्यापैकी कैवळ चार ठिकाणी बायोगॅस प्रकल्प सुरु करण्यात आलेले आहे. उर्वरीत प्रकल्प कधी राबविणार आहे असा सवाल घेगडे यांनी उपस्थित केला आहे. या शिवाय वेस्ट टू एनर्जी -कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प राबविण्याच्या बाता केवळ महापालिका प्रशासनाकडून झोडल्या जात आहे. तो प्रकल्प ही कधी अस्तित्वात येणार याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही.

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दल