शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे लोकसभेसाठी आनंद परांजपे अजितदादांसोबत; भाजपामध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 07:53 IST

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ मित्रपक्षांना सोडणे स्वीकारणार?

-अनिकेत घमंडी डोंबिवली : ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आगामी लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभेसाठी रिंगणात उतरण्याची इच्छा असल्याने परांजपे अजितदादांसोबत गेल्याची चर्चा आहे. परांजपे यांनीही याला दुजोरा दिला.

परांजपे यांनी रविवारी अजित पवार यांच्यासमवेतच राहण्याचा निर्धार केला. तत्पूर्वी त्यांनी आव्हाड यांच्याशी चर्चा केली आणि मग निर्णय घेतला., असे सांगण्यात आले. कल्याण लोकसभेसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात केले. मात्र ठाणे लोकसभेसाठी  नेमका उमेदवार कोण व तो भाजपचा असेल की शिंदे गटाचा हे स्पष्ट झाले नव्हते. उपमुख्यमंत्री पवार ठाणे लोकसभेची जागा मागू शकतात. 

जिव्हाळ्याचे संबंधपरांजपे हे रेल्वेच्या प्रश्नांविषयी अभ्यासू नेते म्हणून ओळळले जातात, ठाण्यात अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीची धुरा त्यांनी सांभाळली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी त्यांचे खूप जिव्हाळा, सलोख्याचे संबंध आहेत.

संभाव्य इच्छुकपरांजपे यांनी इच्छा व्यक्त केली असून ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याकरिता इच्छुक असलेले भाजपमधील माजी खासदार संजीव नाईक, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे हे ठाणे व कल्याण लोकसभेची जागा मित्रपक्षांना सोडून देणे स्वीकारतात का, याबाबत औत्सुक्याचे आहे.

२०२४ मध्ये निवडणूक लढण्याची तीव्र इच्छाआता राजकीय समीकरण बदलले असले तरीही ठाण्यातून उभे राहण्याची इच्छा परांजपे यांनी ठेवली आहे. या आधी त्यांचे वडील प्रकाश परांजपे यांचे निधन झाल्यावर २००९ मध्ये कल्याण लोकसभेची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यात निवडणूक झाली आणि त्यावेळी त्यांनी दिवंगत वसंत डावखरे यांचा पराभव केला होता. जानेवारी २०१२ मध्ये परांजपे यांनी शिवसेनेची ठाण्यातील कार्यपद्धती पटत नसल्याने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आता पुन्हा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत परांजपे यांना निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

मी इच्छुक आहेच, पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, पण संधी मिळावी अशी माझी प्रामाणिक मागणी आहे.- आनंद परांजपे, माजी खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक