शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही ‘आप कतार में हैं’; ठाण्यात जवाहर स्मशानभूमीत जनरेटरअभावी अंत्यसंस्कारांचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 08:35 IST

अजित मांडके/विशाल हळदे  लोकमत न्यूज नेटवर्क  ठाणे : दोन वर्षांपूर्वी अत्याधुनिक स्वरूपात सुरू झालेल्या जवाहरबाग स्मशानभूमीत चार विद्युत दाहिनी ...

अजित मांडके/विशाल हळदे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : दोन वर्षांपूर्वी अत्याधुनिक स्वरूपात सुरू झालेल्या जवाहरबाग स्मशानभूमीत चार विद्युत दाहिनी आहेत, परंतु जनरेटरची व्यवस्था नसल्याने अंत्यसंस्कारावेळी अचानक वीज गेली, तर वीजपुरवठा पूर्ववत होईपर्यंत मृतांच्या नातलगांना प्रतीक्षा करावी लागते. गुरुवारी एक कुटुंब अंत्यसंस्कारासाठी आले असताना, वीजपुरवठा बंद झाला. तब्बल तासभर त्यांना तिष्ठत राहावे लागले. सुदैव एवढेच की, मृतदेह विद्युत दाहिनीत ठेवल्यावर वीजपुरवठा खंडित झाला नाही, अन्यथा मृत्यूनंतरही मृतदेहाची विटंबना होण्याचा संतापजनक प्रकार अनुभवास आला असता. त्यामुळे जवाहरबाग स्मशानभूमीत जनरेटरची सुविधा लागलीच उपलब्ध करण्याची मागणी होत आहे. 

ठाणे शहरातील मध्यवर्ती भागातील जुनी स्मशानभूमी ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेली जवाहरबाग स्मशानभूमी ही सर्वांत जुनी स्मशानभूमी आहे. जुन्या स्मशानभूमीच्या जागेच्या चारपट म्हणजेच तीन हजार चौरस मीटर क्षेत्रफळात नवीन स्मशानभूमी उभारली आहे. येथील उष्णता, धूर शोषून घेण्यासाठी चिमणी बसविली आहे. त्यामुळे आसपासच्या भागाला यापूर्वी होणारा त्रास कमी झाला. सद्य:स्थितीत या ठिकाणी चार विद्युत दाहिनी आणि लाकडावरील अंत्यसंस्काराची पाच अशी व्यवस्था आहे. २०२२ च्या सुमारास नव्याने ही स्मशानभूमी सज्ज झाली. या स्मशानभूमीत रोजच्या रोज १० ते १५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात.

मृतदेह ठेवताच वीज गायबगुरुवारी सायंकाळी एक कुटुंब अंत्यसंस्कारासाठी आले होते. मृतदेह विद्युत दाहिनीत ठेवणार तोच वीजपुरवठा खंडित झाला. मृतदेह दाहिनीत ठेवून दरवाजा बंद केला नव्हता. वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत एक तास गेला. त्यामुळे आलेले कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवार ताटकळले. जनरेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नातलगांनी यावेळी केली. वीजपुरवठा बेभरवशाचा असल्याने महानगर गॅसची वाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले होते. गॅस दाहिनीचा पर्याय उपलब्ध झाला, तरी नातलगांना ताटकळावे लागणार नाही. परंतु, गॅस वाहिनी टाकण्याचे पुढे काय झाले ते येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा माहीत नाही.

धुराचा त्रासधुराचा त्रास होऊ नये, म्हणून विविध उपाययोजना केल्या असल्या, तरी आजही येथील आजूबाजूच्या नागरिकांना लाकडापासून होणाऱ्या धुराचा त्रास सहन करावा लागतो. येथील बहुसंख्य पंखे बंद आहेत. तसेच, याठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली जाणार होती. परंतु, ते काम अर्धवट स्थितीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यू