शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मलंगगड परिसरातील बत्ती गुल; संतप्त शिवसैनिकांचा वीज वितरण कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 15:57 IST

अधिकाऱ्यांच्या दालनात मेणबत्त्या पेटवून केली चर्चा

कल्याण-कल्याण आणि अंबरनाथ ग्रामीण परिसरातील मंलगगड परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. वाढत्या उकाडय़ात रात्री नागरीकांच्या झोपेचे खोबरे करणा:या वीज वितरण कंपनीच्या विरोधात शिवसैनिकांनी कल्याणमधील तेजश्री वीच वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी अधिका:यांच्या दालनात मेणबत्त्या पेटवून चर्चा केली. वीज पुरवठा सुरळीत झाला नाही यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अधिकारी वर्गास दिला आहे.

शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यासह मलंगगड परिसरातील चैनू जाधव यांच्यासह वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चात महिला वर्ग मोठया संख्यने सहभागी झाला होता. त्यात लहान मुलेही सहभागी झाली होती. माजी नगरसेवक गायकवाड यांनी काही दिवसापूर्वी मलंगगड परिसरातील खंडीत वीज पुरवठा प्रकरणी अधिकारी वर्गाला निवेदन देऊन पुरवठा सुरळित केला जावा अशी मागणी केली होती. त्याची अधिकारी वर्गाने दखल घेतली नाही. त्यानंतरही वीज पुरवठा खंडीत होत राहल्याने संतप्त शिवसैनिकांनी आज वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले. अभियंते दीपक पाटील यांचे दालनात प्रवेश केला. पाटील यांच्या कार्यालयातील वीजेचे दिवे बंद करण्यात आले. शिष्ट मंडळाने पाटील यांच्या दालनात चक्क मेणबत्त्या पेटवून पेटलेल्या मेणबत्यांच्या उजेडात चर्चा केली. 

अंधारात मेणबत्तीच्या उजेडात नागरीकांची काय अवस्था होते याची अधिकारी वर्गास जाणीव व्हावी यासाठी मोर्चेक:यांनी मेणबत्त्या पेटविल्या होत्या. मात्र पोलिसांनी या मेणबत्त्या हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही मंडळींनी पेटलेल्या मेणबत्त्या पोलिसांना देण्यास नकार दिला. शिष्टमंडळाने अधिकारी वर्गास इशारा दिला आहे की, पुरवठासुरळीत झाला नाही तर यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. माजी नगरसेवक गायकवाड यांनी सांगितले की, मलंग गडातील वीज पुरवठा रात्री १० वाजता गुल केला जातो. जवळपास ८ तास वीज गुल असते. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरीक, महिला, लहान मुले यांचे जास्त हाल होत आहेत. हा प्रकार तातडीने बंद झाला पाहिजे.

वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले असले तरी राज्यात विज टंचाई आहे. मलंग गड भागातील भार नियमन हे आपतकालीन आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणShiv Senaशिवसेना