शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"गणेशोत्सव काळात 'कोकण रेल्वे'वर मालगाड्यांची वाहूतक बंद करून १०० गाड्या जास्तीच्या सोडा", शिवसेना ठाकरे गटाची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: July 30, 2024 19:06 IST

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावरुन गणेशोत्सव काळात १५ दिवसाकरीता मालगाड्यांची वाहतूक बंद करण्यात यावी. या मालगाड्यांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी. या मार्गावर गणेशोत्सवाकरीता अप डाऊन किमान १०० फेऱ्या सोडल्या जाव्यात अशी मागणी उद्धव सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

- मुरलीधर भवार

कल्याण - कोकण रेल्वे मार्गावरुन गणेशोत्सव काळात १५ दिवसाकरीता मालगाड्यांची वाहतूक बंद करण्यात यावी. या मालगाड्यांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी. या मार्गावर गणेशोत्सवाकरीता अप डाऊन किमान १०० फेऱ्या सोडल्या जाव्यात अशी मागणी उद्धव सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

कल्याण लोकसभेतून उद्धव सेनेच्या शिष्ट मंडळाने कोकण रेल्वेच्या अधिकाऱ््यांची भेट घेतली. कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर - राणे यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्य परिचालन प्रबंधक व्ही. सी. सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी उप जिल्हाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख वैभव शिरोडकरआदी उपस्थित होते.

दरवर्षी गणेशोत्सवाकरिता १ ते १८ सप्टेंबर दरम्यान कोकण रेल्वेने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गे गणपती उत्सव विशेष गाड्या सोडल्या जातात. यंदाही गाड्या साेडल्या जाणार आहेत. त्याचे प्रवासी आरक्षण फुल्ल झाल्या प्रत्येक गाडीला वेटिंग लिस्ट आहे. कोकण रेल्वे मार्गावर उत्सव कालावधीत अजुन जादा गाड्या सोडता येत नाहीत. हे कारण रेल्वेकडून नेहमी सांगितले जाते. कारण ट्रॅक व्यस्त असल्याने आणि क्षमता संपल्याने आणखी अतिरिक्त गाड्या सोडता येत नाहीत. उद्धव सेनेच्या मते प्रत्येक दिवशी ६ ते ७ मालगाड्या सोडल्या जातात. उत्सव काळातील १५ दिवसांमध्ये मालगाड्या पूर्णतः बंद करुन त्यांची वाहतूक पर्यायी दुसऱ्या मार्गाने वळवून त्या जागी किमान अप डाऊन १०० फेऱ्या सोडल्या जाऊ शकतात.

कोकण रेल्वे मार्गाने दक्षिण भारतात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अती जलद गाड्या उत्सव काळात कोकण मार्ग वगळून पूर्वीच्या मार्गाने वळविण्यात याव्यात. म्हणजे त्या जागी काही नव्या गाड्या सोडल्या जाऊ शकतात. कुडाळ आणि सावंतवाडी या दरम्यान झाराप हे रेल्वे स्टेशन आहे. गणेशोत्सव काळात काही गाड्यांना या स्टेशनवर थांबा देण्यात यावा. कारण हे स्टेशन वेंगुर्ला तालुका सावंतवाडी , कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे येथील सुमारे १०० गावांना सोयीचे मध्यवर्ती ठिकाण आहे. काही गाड्यांना दिवा जंक्शन येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळाच्या आग्रही मागणी नुसार अजून अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचे आश्वासन दिले. 

 

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवKonkan Railwayकोकण रेल्वे