शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

"गणेशोत्सव काळात 'कोकण रेल्वे'वर मालगाड्यांची वाहूतक बंद करून १०० गाड्या जास्तीच्या सोडा", शिवसेना ठाकरे गटाची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: July 30, 2024 19:06 IST

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावरुन गणेशोत्सव काळात १५ दिवसाकरीता मालगाड्यांची वाहतूक बंद करण्यात यावी. या मालगाड्यांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी. या मार्गावर गणेशोत्सवाकरीता अप डाऊन किमान १०० फेऱ्या सोडल्या जाव्यात अशी मागणी उद्धव सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

- मुरलीधर भवार

कल्याण - कोकण रेल्वे मार्गावरुन गणेशोत्सव काळात १५ दिवसाकरीता मालगाड्यांची वाहतूक बंद करण्यात यावी. या मालगाड्यांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी. या मार्गावर गणेशोत्सवाकरीता अप डाऊन किमान १०० फेऱ्या सोडल्या जाव्यात अशी मागणी उद्धव सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

कल्याण लोकसभेतून उद्धव सेनेच्या शिष्ट मंडळाने कोकण रेल्वेच्या अधिकाऱ््यांची भेट घेतली. कल्याण जिल्हा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर - राणे यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मुख्य परिचालन प्रबंधक व्ही. सी. सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी उप जिल्हाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख वैभव शिरोडकरआदी उपस्थित होते.

दरवर्षी गणेशोत्सवाकरिता १ ते १८ सप्टेंबर दरम्यान कोकण रेल्वेने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गे गणपती उत्सव विशेष गाड्या सोडल्या जातात. यंदाही गाड्या साेडल्या जाणार आहेत. त्याचे प्रवासी आरक्षण फुल्ल झाल्या प्रत्येक गाडीला वेटिंग लिस्ट आहे. कोकण रेल्वे मार्गावर उत्सव कालावधीत अजुन जादा गाड्या सोडता येत नाहीत. हे कारण रेल्वेकडून नेहमी सांगितले जाते. कारण ट्रॅक व्यस्त असल्याने आणि क्षमता संपल्याने आणखी अतिरिक्त गाड्या सोडता येत नाहीत. उद्धव सेनेच्या मते प्रत्येक दिवशी ६ ते ७ मालगाड्या सोडल्या जातात. उत्सव काळातील १५ दिवसांमध्ये मालगाड्या पूर्णतः बंद करुन त्यांची वाहतूक पर्यायी दुसऱ्या मार्गाने वळवून त्या जागी किमान अप डाऊन १०० फेऱ्या सोडल्या जाऊ शकतात.

कोकण रेल्वे मार्गाने दक्षिण भारतात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अती जलद गाड्या उत्सव काळात कोकण मार्ग वगळून पूर्वीच्या मार्गाने वळविण्यात याव्यात. म्हणजे त्या जागी काही नव्या गाड्या सोडल्या जाऊ शकतात. कुडाळ आणि सावंतवाडी या दरम्यान झाराप हे रेल्वे स्टेशन आहे. गणेशोत्सव काळात काही गाड्यांना या स्टेशनवर थांबा देण्यात यावा. कारण हे स्टेशन वेंगुर्ला तालुका सावंतवाडी , कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे येथील सुमारे १०० गावांना सोयीचे मध्यवर्ती ठिकाण आहे. काही गाड्यांना दिवा जंक्शन येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळाच्या आग्रही मागणी नुसार अजून अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचे आश्वासन दिले. 

 

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवKonkan Railwayकोकण रेल्वे