शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

महापारेषणच्या बिघाडामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात वीजपुरवठा बाधित

By सचिन सागरे | Updated: March 31, 2024 17:57 IST

महापारेषणकडून सायंकाळी साडेपाचपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कल्याण : महापारेषणच्या पडघा ते अंबरनाथ दरम्यानच्या १०० केव्ही वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर चारच्या काही भागांमधील महावितरणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. रविवारी सकाळी सातच्या सुमारास झालेला बिघाड महापारेषणकडून दुरूस्त होईपर्यंत संबंधित भागात भार व्यवस्थापन करून वीजपुरवठा करण्यात आला.

महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातून अंबरनाथकडे येणाऱ्या १०० केव्ही उच्चदाब वाहिनीत रविवारी सकाळी बिघाड झाला. परिणामी या वाहिनीवरून वीजुपरवठा होणाऱ्या महावितरणच्या बदलापूर पूर्व आणि पश्चिम, अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम तसेच उल्हासनगर चार उपविभागातील कांही भागांचा वीजपुरवठा बाधित झाला. महापारेषणकडून बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम सूरू होते. मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत बिघाड दुरूस्त होऊ शकला नव्हता. त्यामुळे पडघा ते मोहने या उच्चदाब वाहीनीद्वारे उपलब्ध स्त्रोताच्या आधारे भार व्यवस्थापन करून बदलापूर, अंबरनाथ व उल्हासनगर चार उपविभागात चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा सुरू होता. दरम्यान सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मुख्य बिघाड निदर्शनास आला असून महापारेषणकडून सायंकाळी साडेपाचपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, गुरुवारी रात्रीही महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील सीटीमध्ये बिघाड झाल्याने बदलापूर आणि परिसरातील महाविरतणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता.

टॅग्स :badlapurबदलापूर