शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

डोंबिवली निवासी भागातील नागरिकांच्या घरी दिवाळीत पाण्याचा ठणठणाट, संतप्त नागरिकांनी घेतली एमआयडीसीच्या कार्यालयावर धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 15:44 IST

Dombivali News: डोंबिवली निवासी परिसरात 30 हजार लोकांची लोकवस्ती आहे. बंगले आणि सोसायटय़ा असलेल्या या भागातील नागरिकांना दिवाळीच्या सणाला पाणी मिळत नाही. गेल्या तीन दिवसापासून पाणी  पुरवठा खंडीत झाला आहे.

डोंबिवली - दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हटले जाते. मात्र डोंबिवलीतील औद्योगिक निवासी परिसरातील नागरिकांच्या घरी दिवाळीत पाणी येत नसल्याने दिवाळी साजरी कशी करायची असा संतप्त सवाल उपस्थित करीत संतप्त नागरीकांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर धाव घेतली. पाणी आले नाही तर आम्ही तुमच्या घरी येणार असा इशारा अभियंत्यास दिला आहे.

डोंबिवली निवासी परिसरात 30 हजार लोकांची लोकवस्ती आहे. बंगले आणि सोसायटय़ा असलेल्या या भागातील नागरिकांना दिवाळीच्या सणाला पाणी मिळत नाही. गेल्या तीन दिवसापासून पाणी  पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे पाण्याशिवाय घरात दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न या नारीकांना उपस्थइत केला. संतप्त नागरीक वर्षा म्हाडीक, सुप्रिया दामले, राजू नलावडे, चंद्रकांत म्हात्रे, प्रफुल्ल बोरकर या नागरीकांनी आज एमआयडीसी कार्यालयावर घाव घेतली. यावेळी त्याठीकाणी पोलिसही पोहचले होते. पोलिसांनी त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. तेव्हा नागरीकांनी आधी कार्यकारी अभियंत्याना पाचारण करा अशी जोरदार मागणी केली. कार्यकारी अभियंते येऊ शकणार असे सांगण्यात आले. त्यांच्या ऐवजी तांत्रिक अभियंते प्रमोद चिनावले त्याठिकाणी पोहचले. नागरीकांनी चिनावले यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला.

चिनावले यांनी सांगितले की, या भागाला जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा केला जातो. त्याठीकाणचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने डोंबिवली निवासी भागाचा पाणी पुरवठा बंद आहे. दुपार्पयत सुरळित केला जाईल असे सांगितले. त्यावर नागरीकांनी सांगितले की, पाणी पुरवठा सुरळित झाला नाही तर नागरीक तुमच्या घरी येऊन राहणार असा इशारा दिला. पाणी पुरवठय़ाची समस्या केवळ तीन दिवसापूरती नाही. ती वारंवार उद्भते. जलवाहिन्या वारंवार फुटल्या जातात. त्यांच्या दुरुस्तीकरीता पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. ही समस्या कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित केला. निवासी भागातील नागरीक पाण्याचे बिल नियमीत भरतात. तरी त्यांच्या नशीबी पाण्याविना राहण्याची वेळ का येते याकडे लक्ष वेधले.

यासंदर्भात अभियंते चिनावले यांनी सांगितले की, निवासी भागातील जलवाहिन्या या जुन्या आणि कमी इंची होती. त्या बदलण्याचे काम सुरु आहे.  त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात हे काम देखील पूर्ण केले जाईल. 

टॅग्स :water shortageपाणीकपातkalyanकल्याणdombivaliडोंबिवली