शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

डोंबिवली निवासी भागातील नागरिकांच्या घरी दिवाळीत पाण्याचा ठणठणाट, संतप्त नागरिकांनी घेतली एमआयडीसीच्या कार्यालयावर धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 15:44 IST

Dombivali News: डोंबिवली निवासी परिसरात 30 हजार लोकांची लोकवस्ती आहे. बंगले आणि सोसायटय़ा असलेल्या या भागातील नागरिकांना दिवाळीच्या सणाला पाणी मिळत नाही. गेल्या तीन दिवसापासून पाणी  पुरवठा खंडीत झाला आहे.

डोंबिवली - दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हटले जाते. मात्र डोंबिवलीतील औद्योगिक निवासी परिसरातील नागरिकांच्या घरी दिवाळीत पाणी येत नसल्याने दिवाळी साजरी कशी करायची असा संतप्त सवाल उपस्थित करीत संतप्त नागरीकांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर धाव घेतली. पाणी आले नाही तर आम्ही तुमच्या घरी येणार असा इशारा अभियंत्यास दिला आहे.

डोंबिवली निवासी परिसरात 30 हजार लोकांची लोकवस्ती आहे. बंगले आणि सोसायटय़ा असलेल्या या भागातील नागरिकांना दिवाळीच्या सणाला पाणी मिळत नाही. गेल्या तीन दिवसापासून पाणी  पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे पाण्याशिवाय घरात दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न या नारीकांना उपस्थइत केला. संतप्त नागरीक वर्षा म्हाडीक, सुप्रिया दामले, राजू नलावडे, चंद्रकांत म्हात्रे, प्रफुल्ल बोरकर या नागरीकांनी आज एमआयडीसी कार्यालयावर घाव घेतली. यावेळी त्याठीकाणी पोलिसही पोहचले होते. पोलिसांनी त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. तेव्हा नागरीकांनी आधी कार्यकारी अभियंत्याना पाचारण करा अशी जोरदार मागणी केली. कार्यकारी अभियंते येऊ शकणार असे सांगण्यात आले. त्यांच्या ऐवजी तांत्रिक अभियंते प्रमोद चिनावले त्याठिकाणी पोहचले. नागरीकांनी चिनावले यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला.

चिनावले यांनी सांगितले की, या भागाला जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा केला जातो. त्याठीकाणचा वीज पुरवठा खंडीत झाल्याने डोंबिवली निवासी भागाचा पाणी पुरवठा बंद आहे. दुपार्पयत सुरळित केला जाईल असे सांगितले. त्यावर नागरीकांनी सांगितले की, पाणी पुरवठा सुरळित झाला नाही तर नागरीक तुमच्या घरी येऊन राहणार असा इशारा दिला. पाणी पुरवठय़ाची समस्या केवळ तीन दिवसापूरती नाही. ती वारंवार उद्भते. जलवाहिन्या वारंवार फुटल्या जातात. त्यांच्या दुरुस्तीकरीता पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. ही समस्या कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित केला. निवासी भागातील नागरीक पाण्याचे बिल नियमीत भरतात. तरी त्यांच्या नशीबी पाण्याविना राहण्याची वेळ का येते याकडे लक्ष वेधले.

यासंदर्भात अभियंते चिनावले यांनी सांगितले की, निवासी भागातील जलवाहिन्या या जुन्या आणि कमी इंची होती. त्या बदलण्याचे काम सुरु आहे.  त्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यात हे काम देखील पूर्ण केले जाईल. 

टॅग्स :water shortageपाणीकपातkalyanकल्याणdombivaliडोंबिवली