शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 18:04 IST

Dombivli Blast : डोंबिवलीतील अमूदान केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीएमआयडीसीतील अंबर (अमूदान) केमिकल कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.या घटनेत आत्तापर्यंत ११ निरपराधांचे बळी गेले असून अद्यापही घटनास्थळी मानवी अवशेष सापडत आहेत. या भीषण स्फोटामुळे आजूबाजूला रासायनिक कारखान्याला चिकटून राहणाऱ्या हजारो कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या स्फोटानंतर कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली असून कोर्टाने मलय मेहताला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र आता कोर्टात आरोपीच्या वकिलाने स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत धक्कादायक माहिती दिली.

डोंबिवलीतल्या अमुदान कंपनीत स्फोट झाल्यानंतर ११ जणांचे मृत्यू झाले होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास स्फोट झाल्यानंतर दिवसभर शोधकार्य करण्यात येत होतं. मात्र रात्री अचानक पुन्हा कंपनीमध्ये आग लागली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. अमुदान कंपनी स्फोट प्रकरणात कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक करण्यात आली होती. अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी आणि मलय मेहता यांना ठाण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर कोर्टाने मलय मेहता यांना २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर मालती मेहता यांची चौकशी करुन सोडून देण्यात आलं आहे. मालती मेहता यांच्या पतीच्या निधनानंतर कंपनी मुलाच्या नावावर करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली. मात्र सुनावणीदरम्यान,मेहतांच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाची माहिती दिली.

स्फोट झाल्यानंतर सुरुवातीला कंपनीमध्ये बॉयलर फुटल्याची माहिती देण्यात येत होती. मात्र नंतर स्फोट झालेल्या कंपनीमध्ये कोणताच बॉयलर नसल्याची माहिती पुढे आली. हा बॉयलरचा स्फोट नसून हा रिएक्टरचा स्फोट असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. शनिवारी कोर्टात  मेहतांच्या वकिलांनी, स्फोटाआधी कंपनीचे मालक देखील तिथे जाणार होते. मात्र त्यांना उशीर झाल्याने ते तिथे पोहचू शकले नाहीत. नाहीतर त्यांच्यासोबतही काहीतरी घडले असते असे सांगितले. हा स्फोट हा वाढत्या उष्णतेमुळे झाल्याचे वकिलाने सांगितले. तसेच मेहता यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की कंपनीकडे सर्व आवश्यक परवानग्या होत्या आणि सर्व नियमांचे पालन केले होते.

या प्रकरणात मध्यस्थी याचिका करणाऱ्या प्रियेश सिंग यांनी ही माहिती दिली. आरोपीच्या वकिलाने सांगितले की तापमान वाढल्यामुळे हा स्फोट झाला. पण तिथले तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी कंपनीने काय केल? तुम्ही निष्काळजीपणा केल्यामुळे हे झालं असा आरोप प्रियेश सिंग यांनी केला आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBlastस्फोटMIDCएमआयडीसीCrime Newsगुन्हेगारी