शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 18:04 IST

Dombivli Blast : डोंबिवलीतील अमूदान केमिकल कंपनीत स्फोट झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीएमआयडीसीतील अंबर (अमूदान) केमिकल कंपनीत गुरुवारी झालेल्या स्फोटानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.या घटनेत आत्तापर्यंत ११ निरपराधांचे बळी गेले असून अद्यापही घटनास्थळी मानवी अवशेष सापडत आहेत. या भीषण स्फोटामुळे आजूबाजूला रासायनिक कारखान्याला चिकटून राहणाऱ्या हजारो कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या स्फोटानंतर कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली असून कोर्टाने मलय मेहताला २९ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र आता कोर्टात आरोपीच्या वकिलाने स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत धक्कादायक माहिती दिली.

डोंबिवलीतल्या अमुदान कंपनीत स्फोट झाल्यानंतर ११ जणांचे मृत्यू झाले होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास स्फोट झाल्यानंतर दिवसभर शोधकार्य करण्यात येत होतं. मात्र रात्री अचानक पुन्हा कंपनीमध्ये आग लागली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. अमुदान कंपनी स्फोट प्रकरणात कंपनीच्या दोन्ही मालकांना अटक करण्यात आली होती. अमुदान कंपनीचे मालक मालती मेहता यांना नाशिक पोलिसांनी आणि मलय मेहता यांना ठाण्याच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर कोर्टाने मलय मेहता यांना २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर मालती मेहता यांची चौकशी करुन सोडून देण्यात आलं आहे. मालती मेहता यांच्या पतीच्या निधनानंतर कंपनी मुलाच्या नावावर करण्यात आली होती, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली. मात्र सुनावणीदरम्यान,मेहतांच्या वकिलांनी कोर्टात महत्त्वाची माहिती दिली.

स्फोट झाल्यानंतर सुरुवातीला कंपनीमध्ये बॉयलर फुटल्याची माहिती देण्यात येत होती. मात्र नंतर स्फोट झालेल्या कंपनीमध्ये कोणताच बॉयलर नसल्याची माहिती पुढे आली. हा बॉयलरचा स्फोट नसून हा रिएक्टरचा स्फोट असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. शनिवारी कोर्टात  मेहतांच्या वकिलांनी, स्फोटाआधी कंपनीचे मालक देखील तिथे जाणार होते. मात्र त्यांना उशीर झाल्याने ते तिथे पोहचू शकले नाहीत. नाहीतर त्यांच्यासोबतही काहीतरी घडले असते असे सांगितले. हा स्फोट हा वाढत्या उष्णतेमुळे झाल्याचे वकिलाने सांगितले. तसेच मेहता यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की कंपनीकडे सर्व आवश्यक परवानग्या होत्या आणि सर्व नियमांचे पालन केले होते.

या प्रकरणात मध्यस्थी याचिका करणाऱ्या प्रियेश सिंग यांनी ही माहिती दिली. आरोपीच्या वकिलाने सांगितले की तापमान वाढल्यामुळे हा स्फोट झाला. पण तिथले तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी कंपनीने काय केल? तुम्ही निष्काळजीपणा केल्यामुळे हे झालं असा आरोप प्रियेश सिंग यांनी केला आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीBlastस्फोटMIDCएमआयडीसीCrime Newsगुन्हेगारी