शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक कारखाने हलवल्यावर तेथे इमारती उभारू नका! २७ गाव संघर्ष समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 09:47 IST

आयटी क्षेत्रातील उद्योग सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: एमआयडीसीमधील धोकादायक रासायनिक कंपन्या तातडीने हलवल्यानंतर त्याठिकाणी इंजीनियरिंग अथवा आय टी क्षेत्रातील उद्योग सुरू करावेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी निवासी इमारती उभार नका, असा इशारा २७ गाव संघर्ष समितीने गुरुवारी दिला. संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने स्फाेट झालेल्या अमुदान कंपनीतील घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता दिलीप आव्हाड यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

‘तातडीने मदत करा’

दुर्घटनेतील मृत आणि जखमी कामगारांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या मागणी बरोबरच ज्या घरांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यांनाही तातडीने मदत देण्याची मागणी समितीने केली. समितीने प्रदुषण नियंत्रण यंत्रणा, बाॅयलर, रिअँक्टरचे इन्स्पेक्शन आणि ऑडिट यावर बोट ठेवून तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. या प्रसंगी गंगाराम शेलार, गुलाब वझे, गजानन मांगरुळकर, भास्कर पाटील, एकनाथ पाटील, दत्तात्रय वझे, बाळाराम ठाकुर,रतन पाटील, रमाकांत पाटील, बुधा वझे, बंडू पाटील, जालंदर पाटील, जितेंद्र ठाकुर, वासुदेव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दाेषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा

हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी समितीने केली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने कार्यवाही होते की नाही याची पडताळणी करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी संबंधितांची भेट घेतली जाईल, असेही समितीने स्पष्ट केले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी