शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रासायनिक कारखाने हलवल्यावर तेथे इमारती उभारू नका! २७ गाव संघर्ष समितीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 09:47 IST

आयटी क्षेत्रातील उद्योग सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: एमआयडीसीमधील धोकादायक रासायनिक कंपन्या तातडीने हलवल्यानंतर त्याठिकाणी इंजीनियरिंग अथवा आय टी क्षेत्रातील उद्योग सुरू करावेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत त्या ठिकाणी निवासी इमारती उभार नका, असा इशारा २७ गाव संघर्ष समितीने गुरुवारी दिला. संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने स्फाेट झालेल्या अमुदान कंपनीतील घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता दिलीप आव्हाड यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

‘तातडीने मदत करा’

दुर्घटनेतील मृत आणि जखमी कामगारांना तातडीने नुकसान भरपाई देण्याच्या मागणी बरोबरच ज्या घरांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यांनाही तातडीने मदत देण्याची मागणी समितीने केली. समितीने प्रदुषण नियंत्रण यंत्रणा, बाॅयलर, रिअँक्टरचे इन्स्पेक्शन आणि ऑडिट यावर बोट ठेवून तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली. या प्रसंगी गंगाराम शेलार, गुलाब वझे, गजानन मांगरुळकर, भास्कर पाटील, एकनाथ पाटील, दत्तात्रय वझे, बाळाराम ठाकुर,रतन पाटील, रमाकांत पाटील, बुधा वझे, बंडू पाटील, जालंदर पाटील, जितेंद्र ठाकुर, वासुदेव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दाेषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा

हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी समितीने केली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने कार्यवाही होते की नाही याची पडताळणी करण्यासाठी दर पंधरा दिवसांनी संबंधितांची भेट घेतली जाईल, असेही समितीने स्पष्ट केले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसी