शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

मराठा समाजाच्या एकाही मुख्यमंत्र्यांना जमल नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं- कपिल पाटील

By प्रशांत माने | Updated: September 3, 2023 21:09 IST

'भाजप नेहमीच मराठा समाजाच्या पाठीशी आहे. जालन्यात घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, त्याचे राजकारण कोणीही करू नये.'

कल्याण: मराठा समाजाचे आतापर्यंत इतके मुख्यमंत्री झाले. परंतू त्यांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखविले अशी भावना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी कल्याणमध्ये व्यक्त केली.पाटील हे कल्याण पश्चिमेतील भाजप कार्यकर्ता मेळाव्याला आले होते. मेळाव्यानंतर प्रसिध्दीमाध्यमांशी जालन्यातील घटनेबाबत भाष्य करताना त्यांनी या भावना मांडल्या.

देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा मराठा समाजातील गरीब लोकांना आरक्षण मिळावे ही भावना सर्वपक्षीयांची होती. फडणवीस यांनी आरक्षण दिले आणि टिकवले. मात्र दुर्दैवाने ते कोर्टाने रद्द केले, मराठा समाजाला आरक्षण पुन्हा मिळावे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे, हे निश्चितपणे यात काही तरी मार्ग काढतील.

जालन्यात घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, त्याचे राजकारण कोणीही करू नये. जे लोकं कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे कधीही बोलले नाहीत, असे लोकही तिकडे जायला लागले आहेत. मराठा समाजाबाबत भारतीय जनता पक्षाच्या अतिशय सकारात्मक भावना आहे, भाजप त्यांच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पक्षाने कधीही मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही, उलट एवढे मराठा मुख्यमंत्री झाले असतील त्यांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवल होते. म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भाजपने केलेले भरीव काम जनतेच्या समोर आहे. भारतीय जनता पक्ष त्याला कधीही विरोध करणार नाही असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण