शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मराठा समाजाच्या एकाही मुख्यमंत्र्यांना जमल नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं- कपिल पाटील

By प्रशांत माने | Updated: September 3, 2023 21:09 IST

'भाजप नेहमीच मराठा समाजाच्या पाठीशी आहे. जालन्यात घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, त्याचे राजकारण कोणीही करू नये.'

कल्याण: मराठा समाजाचे आतापर्यंत इतके मुख्यमंत्री झाले. परंतू त्यांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखविले अशी भावना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी रविवारी कल्याणमध्ये व्यक्त केली.पाटील हे कल्याण पश्चिमेतील भाजप कार्यकर्ता मेळाव्याला आले होते. मेळाव्यानंतर प्रसिध्दीमाध्यमांशी जालन्यातील घटनेबाबत भाष्य करताना त्यांनी या भावना मांडल्या.

देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा मराठा समाजातील गरीब लोकांना आरक्षण मिळावे ही भावना सर्वपक्षीयांची होती. फडणवीस यांनी आरक्षण दिले आणि टिकवले. मात्र दुर्दैवाने ते कोर्टाने रद्द केले, मराठा समाजाला आरक्षण पुन्हा मिळावे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे, हे निश्चितपणे यात काही तरी मार्ग काढतील.

जालन्यात घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे, त्याचे राजकारण कोणीही करू नये. जे लोकं कधीही मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे कधीही बोलले नाहीत, असे लोकही तिकडे जायला लागले आहेत. मराठा समाजाबाबत भारतीय जनता पक्षाच्या अतिशय सकारात्मक भावना आहे, भाजप त्यांच्या पाठीशी आहे. भारतीय जनता पक्षाने कधीही मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही, उलट एवढे मराठा मुख्यमंत्री झाले असतील त्यांना जे जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवल होते. म्हणून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भाजपने केलेले भरीव काम जनतेच्या समोर आहे. भारतीय जनता पक्ष त्याला कधीही विरोध करणार नाही असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalanaजालनाMaratha Reservationमराठा आरक्षण