शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘डोंबिवली ते स्टॅच्यू ऑफ युनिटी’ सायकलवरून प्रवास; चार दिवसांत ४२५ किलोमीटरचे अंतर पार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 07:01 IST

या राईडमध्ये शाळेचे ट्रस्टी, पुण्याचे मित्र यांचा सल्ला घेतला. तलासरी आणि भरूच इथे जैन टेम्पलमध्ये राहण्याची सोय झाली आणि एक दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले.

अनिकेत घमंडीडोंबिवली : मुलुंड येथील एका शाळेत शिक्षकीपेशा सांभाळून सायकलिंगचा छंद जोपासणाऱ्या डोंबिवलीकर मीरा वैद्य यांनी ७ ते १० सप्टेंबर या चार दिवसांत डोंबिवली ते स्टॅच्यू ऑफ युनिटी हे ४२५ कि.मीचे अंतर सायकलने एकटीने पूर्ण केले. 

त्यांनी त्या प्रवासाची आखणी काही महिने आधी स्वतःच केली होती. त्यासाठी डोंबिवली-तलासरी-नवसारी- भरूच -स्टॅच्यू ऑफ युनिटी असा मार्ग निवडला होता. यापूर्वी पुणे-जम्मू सायकलिंग याच मार्गावरून केल्याने त्यांना रस्त्याची माहिती होती. जेव्हा एकटीने जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही जणांनी करू शकतेस असे म्हणत मनोधैर्य उंचावले, तर काही जणांनी नका करू, असेही सांगितले. पण, मनात तीव्र इच्छाशक्ती असल्याने एकटीनेच ही राईड पूर्ण करणार असे ठरविले, असे वैद्य म्हणाल्या.

या राईडमध्ये शाळेचे ट्रस्टी, पुण्याचे मित्र यांचा सल्ला घेतला. तलासरी आणि भरूच इथे जैन टेम्पलमध्ये राहण्याची सोय झाली आणि एक दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले. त्या भागातही पावसामुळे रस्ते खूप खराब होते. त्यामुळे सायकलची खूप काळजी घ्यावी लागत होती. सतत काही अंतरावर पाऊस पडत असल्याने पूर्ण चार दिवस भिजत राईड पूर्ण करावी लागली, असे त्या म्हणाल्या.

आपण आपली काळजी घ्यावीजेव्हा पाच कि.मी.वरून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे दर्शन झाले, तेव्हा तर आनंद गगनात मावेनासा झाला. कोणी विचारले नाही तरी सांगावेसे वाटते की हो मी माझे स्वप्न पूर्ण केले. आता पूर्ण केलेल्या स्वप्नामुळे आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. एकटीने प्रवास करताना कोणताही वाईट अनुभव न आल्याने सर्व महिलांना सांगावेसे वाटते, सगळे जग वाईट नसते, फक्त आपण आपली काळजी घेत प्रवास सुरू ठेवायचा. राईड करताना बरेच स्थानिक हात उंचावून शुभेच्छा देत होते, तर कोणी एकटीने हे धाडस केले याचे कौतुक करीत होते, असे मीरा वैद्य  यांनी सांगितले.