शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : सांगा, कोरोना रोखायचा तरी कसा?, केडीएमसीसमाेर गंभीर प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 13:34 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त हाेत असताना नगरिकांकडून नियमांना दिली जात असलेली तिलांजली कोरोनासंबंधी चिंता वाढवणारी आहे.

कल्याण - दिवाळीपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली होती, पण आता पुन्हा रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने आणि केडीएमसीने घालून दिलेल्या नियमांचे सर्रास होत असलेले उल्लंघन याला कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे काेराेनाला राेखायचे तरी कसे, असा प्रश्न सध्या पालिका प्रशासनाला भेडसावत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त हाेत असताना नागरिकांकडून नियमांना दिली जात असलेली तिलांजली कोरोनासंबंधी चिंता वाढवणारी आहे.

केडीएमसीच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या अनलॉकमध्ये रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात सर्वाधिक म्हणजे १३ हजार ३९२ रुग्णांची नोंद झाली होती. १२ जुलैला एका दिवसात तब्बल ६६१ रुग्ण आढळले होते. गणेशोत्सव कालावधीत नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने सप्टेंबरमध्येही कोरोनाचा कहर कायम राहिला. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि वाढवलेल्या कोरोना चाचण्या यात केडीएमसीला कोरोनावर काही प्रमाणात का होईना, अंकुश आणण्यात यश आले. दिवाळीपूर्वी म्हणजे १० नोव्हेंबरला सर्वात कमी म्हणजे ५९ रुग्ण आढळून आले होते. पण, पुन्हा रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने दिवाळी खरेदीनिमित्त सर्वत्र झालेली गर्दी आणि नियमांचे नागरिकांकडून सर्रास होत असलेले उल्लंघन रुग्णवाढीला कारणीभूत ठरल्याची शंका व्यक्त होत आहे.

कारवाई अधिक तीव्र करण्याची मागणी

अनलॉकमध्ये सर्वत्र बहुतांश व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वावरताना चेहऱ्यावर मास्क रूमाल, कापड परिधान करणे बंधनकारक आहे. पण, बऱ्याच ठिकाणी नागरिकांकडून या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई महापालिका करत असली, तरी या कारवाईचे भय राहिलेले नाही. तरुणांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सर्रास दिसत असले तरी भाजीविक्रेते, फेरीवाले, दुकानदारही त्यांना घालून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. एकूणच हे चित्र पाहता केडीएमसीने कारवाई अधिक तीव्र करायला हवी, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणdombivaliडोंबिवली