शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"रेल्वे आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी सक्तीने भूसंपादनाची प्रक्रिया राबविणार, येत्या आठवड्यात भूसंपादन सुरू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 13:19 IST

Kalyan News: कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्यासाठी जमीन संपादन करण्यासाठी थेट खरेदीची प्रक्रिया राबविला जात होती. या प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळत असल्याने येत्या आठवडय़ात सक्तीने जमीन संपादनाची प्रक्रिया राबविली जाईल

कल्याण - कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्यासाठी जमीन संपादन करण्यासाठी थेट खरेदीची प्रक्रिया राबविला जात होती. या प्रक्रियेस अल्प प्रतिसाद मिळत असल्याने येत्या आठवडय़ात सक्तीने जमीन संपादनाची प्रक्रिया राबविली जाईल अशी माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया गतमान होऊन संपादनाची प्रक्रिया पूर्ण होताच प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे उपविभागीय अधिका:यांनी सांगितले.

कल्याण ते कसारा रेल्वे मार्गा दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्यासाठी ९,८४ हेक्टर जमीन संपादीत करायची आहे. या प्रकल्पात बेरे, राये, पितांबरे, वावेघर, खडवली, बल्याणी, गुरवली, चिंचवली, मोस, मोहने, आंबिवली, मांडा, अटाळी, चिकणघर या गावातील जमीन बाधित होत आहेत. यामध्ये सातबाराचे २२८ गट आहे. जमीन संपादनाकरीता उपविभागीय कार्यालयाकडून जमीनीच्या थेट खरेदीची प्रक्रिया राबविली गेली होती. त्यास अत्यल्प प्रतिसाद आला. २२८ पैकी केवळ पाचच गटांचे संपादन करण्यात आले आहे. कल्याण कसारा दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन विकसीत करण्याचा रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी भूसंपादन तातडीने होण्याकरीता थेट खरेदीची प्रक्रिया राबविली होती. मात्र त्यातून संपादन होत नसल्याने आत्ता सक्तीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्याची सुरुवात येत्या आठवडाभरात केली जाईल.

कल्याण कसारा प्रमाणोच कल्याण बदलापूर याठिकाणीही रेल्वेची तिसरी लाईन विकसीत करण्यासाठी २५ एकर जागा संपादीत करायची आहे. त्यासाठीही जमीन खरेदीची थेट प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्याठिकाणीही प्रतिसाद कमी असल्याने तिथेही सक्तीचे संपादन केले जाणार आहे.

रेल्वेच्या कल्याण कसारा व कल्याण बदलापूर लाईनसाठी सक्तीचे भूसंपादन राबविले जाणार आहे. त्याच धर्तीवर कल्याण शीळफाटा रस्त्याच्या सहा पदरीकरणाकरीता ७.१२ हेक्टर जमीन संपादीत करायची आहे. या रस्त्याच्या सहा पदरीकरणात निळजे, काटई, नेतीवली, कचोरे, सागव, सोनारपाडा, घारीवली, मानगाव याठिकाणची जमीन बाधित होणार आहे. सध्या या रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम सुरु आहे. हा रस्ता या पूर्वी चौपदरी होता. सध्या अस्तित्वात असलेल्या चौपदरी रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण सुरु आहे. मात्र सहाव्या पदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेकरीताही जमीन संपादनाची प्रक्रिया येत्या आठवडय़ात सुरु केली जाईल. त्यासाठी सक्तीने भूसंपादन केले जाईल. रेल्वे आणि रस्ते प्रकल्पासाठी सक्तीचे भूसंपादन करुन संपादनाची प्रक्रिया येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचे लक्ष्य डोळ्य़ासमोर ठेवण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी भांडे पाटील यांनी सांगितले.

रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनात बाधित होणा:याकरीता जवळपास २०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची तजवीज केली जाणार आहे. त्याच प्रमाणे कल्याण शीळ रस्त्याच्या सहा पदरीकरणात बाधित होणा:यांकरीता १०० कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची तजवीज करण्यात आली आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेkalyanकल्याण