शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

पत्री पूलाच्या गर्डर आधी अप्रोच रोडचे काम पूर्ण करा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 17:44 IST

९० फुटी रस्त्याच्या अप्रोच रोडची केली पाहणी; आयुक्तांच्या भेटीचा प्रयत्न

कल्याण-कल्याणच्या पत्री पुलाच्या कामात आधीच विलंब झाला आहे. या पूलाला ९० फुटी रस्त्याचा अप्रोच रोड आहे. या अप्रोच रोडचे काम गेल्या सहा वर्षापासून अर्धवट आहे. या रस्त्याचे काम पूर्ण केले तर वाहतूक कोंडी सुटू शकते. अन्यथा पत्री पुलाचे काम पूर्ण करुन काही उपयोग होणार नाही याकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे.९० फुटी रस्त्या हा पत्री पूलाला येऊन मिळतो. हा अप्रोच रोडचे काम पत्री पुलानजीक रखडले आहे. या पूलाचे काम शिवसेनेच्या माजी महापौरांमुळे अडले आहे. हे काम गेल्या सहा वर्षापासून केले जात नाही. या रस्त्याच्या प्रकरणी स्थानिक नागरीक काशीनाथ गुरव यांनी राज्यपालार्पयत पाठपुरावा केला गेला आहे. त्याची दखल घेतली जात नाही. आज दुपारी एकीकडे पत्री पूलाच्या गर्डरचे लॉचिंग सुरु असताना आमदार पाटील यांनी ९० फूटी अर्धवट असलेल्या अप्रोच रस्त्याची पाहणी करन महापालिका अभियंत्यास जाब विचारला. यावेळी जागरुक नागरीक गुरुव यांचीही भेट घेतली. अभियंत्यास नीट उत्तरे देता येत नसल्याने पत्री पूलाच्या दिशेने आमदार मनसे कार्यकत्र्यासह निघाले असता पूलाच्या एका टोकास  आमदारांसह कार्यकत्र्याची पोलिसांनी अडवणूक केली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला. त्यावर मनसे आमदारांनी आम्हाला आयुक्तांना भेटायचे आहे. त्यांना इथे बोलवा अन्यथा आम्हाला त्याठिकाणी जाऊ द्या असा आग्रह धरला. आमदार पाटील हे पूलाच्या ठिकाणी येताच आयुक्त त्याठिकाणाहून निघून गेले आहे. आयुक्तांशी फोनवर बोलणी केली असता त्यांनी सोमवारी यावर चर्चा करण्याचे मान्य केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.पत्री पूलाच्या कामात आधीच विलंब झाला असून पूलाच्या गर्डरचे लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही. पूलाच्या कामाच्या ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले होते. डोंबिवली हे त्यांचे आजोळ आहे. त्यांनी पत्री पूलाप्रमाणो कोपर पूल, मोठा गाव ठाकूर्ली-माणकोली खाडी पूल, दुर्गाडी पूल, पलावा पूल आणि आंबिवली येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम मार्गी लावण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे. मनसेच्या कार्यकत्र्यानी सोशल मिडियावर पूलाचे गर्डर बसवण्याचा एव्हेंट केला जात आहे. पूलाचे गर्डर सरविण्यासाठी आदित्य ठाकरे येत आहेत. याचे व्यंग चित्र सोशल मिडियावर व्हायरल केले होते.

भाजपच्या नगरसेविका रेखा चौधरी यांनी सांगितले की, पत्री पूलाचे काम हे गेल्या अनेक दिवसापासून रखडलेले आहे. केंद्र सरकारच्या प्रयत्नांनी हे काम होत असल्याचे सांगितले. त्यांच्या या व्यक्तव्याने त्यांनी शिवसेनाला श्रेय दिले नाही. अन्य पूलही मार्गी लावले जावेत. कल्याण डोंबिवलीकर चारही बाजूने पूल कोंडीत सापडले असल्याची टिकाही चौधरी यांनी केली.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे