शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:43 IST

महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

कल्याण: महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या अ प्रभागातील आंबिवली येथील नेपच्यून स्वराज येथील आरक्षित भूखंडावर वृक्षारोपण करतेवळी त्यांनी हे उद्गार काढले. या परिसरात कबड्डी खेळणारे खूप तरुण आहेत, त्यामुळे या परिसरामध्ये आपण जास्तीत जास्त कबड्डीचे मैदाने तयार करण्याचा प्रयत्न करु, असेही ते पुढे म्हणाले. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे औचित्य साधून आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील स्वच्छता दूत, एनजीओ, इमारतीच्या आवारात खत प्रकल्प राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्था, स्वच्छता कामगार यांचा प्रशस्तीपत्रक देऊन आयुक्त सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेची जबाबदारी घेऊन आपला परिसर व आपले शहर स्वच्छ व सुंदर कसे राहील याची काळजी घ्यावी. 

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही स्वतःची जबाबदारी ओळखून त्यामध्ये कुचराई होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी व नागरिकांच्या सहकार्याने आपल्या शहराच्या किमान स्वच्छतेच्या बाबतीत तरी कायापालट करावा, असे आवाहन  सूर्यवंशी यांनी करुन उपस्थितां समवेत स्वच्छतेची शपथ घेतली .राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महापालिकेच्या प्रभागांत ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका