शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 15:43 IST

महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले.

लोकमत न्यूज नेटवर्क 

कल्याण: महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या अ प्रभागातील आंबिवली येथील नेपच्यून स्वराज येथील आरक्षित भूखंडावर वृक्षारोपण करतेवळी त्यांनी हे उद्गार काढले. या परिसरात कबड्डी खेळणारे खूप तरुण आहेत, त्यामुळे या परिसरामध्ये आपण जास्तीत जास्त कबड्डीचे मैदाने तयार करण्याचा प्रयत्न करु, असेही ते पुढे म्हणाले. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे औचित्य साधून आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील स्वच्छता दूत, एनजीओ, इमारतीच्या आवारात खत प्रकल्प राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्था, स्वच्छता कामगार यांचा प्रशस्तीपत्रक देऊन आयुक्त सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेची जबाबदारी घेऊन आपला परिसर व आपले शहर स्वच्छ व सुंदर कसे राहील याची काळजी घ्यावी. 

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही स्वतःची जबाबदारी ओळखून त्यामध्ये कुचराई होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी व नागरिकांच्या सहकार्याने आपल्या शहराच्या किमान स्वच्छतेच्या बाबतीत तरी कायापालट करावा, असे आवाहन  सूर्यवंशी यांनी करुन उपस्थितां समवेत स्वच्छतेची शपथ घेतली .राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महापालिकेच्या प्रभागांत ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका