शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

'धन्यवाद नरेंद्र मोदीजी' उपक्रमाला भाजपाच्या कल्याण बालेकिल्ल्यात उदंड प्रतिसाद

By अनिकेत घमंडी | Updated: November 7, 2022 11:26 IST

पक्षाच्या युवा मोर्चा कल्याण जिल्ह्यातून दहा हजार पत्र पाठवणार

डोंबिवली: नागरिकांना केंद्र सरकारच्या लाभदायी योजनांचा लाभ मिळाला आहे. त्या नागरिकांनी मिळालेल्या योजनेच्या नावाचा उल्लेख करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद मोदीजी या मजकुराचे पोस्टकार्ड लिहून मोदींचे आभार मानणारे पत्र नागरिकांच्या माध्यमातून पाठवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कल्याण जिल्ह्यातून १० हजार पत्र पाठवण्यात येणार असून रविवारी त्या उपक्रमांतर्गत ५ हजार पत्र पाठवण्यात आली आहेत.

युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई यांनी सोमवारी ही माहिती देतांना सांगितले।की, भाजप कल्याण जिल्ह्यात डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ ह्या शहरांमध्ये युवा मोर्चा च्या माध्यमातून धन्यवाद मोदीजी या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून त्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजयुमोच्या वतीने रविवारी मेगा ड्राइव्ह घेण्यात आला. त्यात पाच हजारहुन अधिक पत्रे ह्या वेळेस नागरीकांनी उत्स्फूर्तपणे पाठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आठवर्षांपासून देशभरातील नागरिकांसाठी लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.

सदर योजनेत गोर गरिबांना घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी केंद्राच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना, महिलांना चूल मुक्ती व्हावी यासाठी उज्वला गॅस योजना, सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्किल इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया लोन योजना, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पंतप्रधान पीकविमा योजना, ग्राम सिंचाई योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, कोविड काळात फळ विक्री व टपरी धारक यांना कुठल्याही प्रकारचे व्याज न घेता दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. मोफत धान्य वितरण, मोफत लसीकरण, बेटी बचाव-बेटी पढाव, सुकन्या योजना, जीवन ज्योती विमा योजना, अटल पेंशन योजना, सुरक्षा विमा योजना यासारख्या अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जातात व नागरिक या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतांना दिसून येत आहे.

देशातील विविध समाजाच्या शेवटच्या घटकांला न्याय देण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाने केले आहे. धन्यवाद मोदीजी हे अभियान राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत पाच लाख लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या हस्ताक्षरातील पाच लाख पत्रे पाठवले जाणार आहे. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, मंडल अध्यक्ष अभिजित करंजुले, अभियान संयोजक पवन पाटील, युवामोर्चा जिल्हा प्रभारी रवी तिवारी, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, कृष्णा पाटील, संदीप पाटील, दुर्वेश राणा, जिल्हा पदाधिकारी स्वानंद भणगे, समीर दलाल, शैलेश देशपांडे व मंडल पदाधिकारी त्यात सहभागी झाले होते.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी