शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

'धन्यवाद नरेंद्र मोदीजी' उपक्रमाला भाजपाच्या कल्याण बालेकिल्ल्यात उदंड प्रतिसाद

By अनिकेत घमंडी | Updated: November 7, 2022 11:26 IST

पक्षाच्या युवा मोर्चा कल्याण जिल्ह्यातून दहा हजार पत्र पाठवणार

डोंबिवली: नागरिकांना केंद्र सरकारच्या लाभदायी योजनांचा लाभ मिळाला आहे. त्या नागरिकांनी मिळालेल्या योजनेच्या नावाचा उल्लेख करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद मोदीजी या मजकुराचे पोस्टकार्ड लिहून मोदींचे आभार मानणारे पत्र नागरिकांच्या माध्यमातून पाठवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कल्याण जिल्ह्यातून १० हजार पत्र पाठवण्यात येणार असून रविवारी त्या उपक्रमांतर्गत ५ हजार पत्र पाठवण्यात आली आहेत.

युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई यांनी सोमवारी ही माहिती देतांना सांगितले।की, भाजप कल्याण जिल्ह्यात डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ ह्या शहरांमध्ये युवा मोर्चा च्या माध्यमातून धन्यवाद मोदीजी या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून त्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजयुमोच्या वतीने रविवारी मेगा ड्राइव्ह घेण्यात आला. त्यात पाच हजारहुन अधिक पत्रे ह्या वेळेस नागरीकांनी उत्स्फूर्तपणे पाठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आठवर्षांपासून देशभरातील नागरिकांसाठी लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.

सदर योजनेत गोर गरिबांना घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी केंद्राच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना, महिलांना चूल मुक्ती व्हावी यासाठी उज्वला गॅस योजना, सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्किल इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया लोन योजना, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पंतप्रधान पीकविमा योजना, ग्राम सिंचाई योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, कोविड काळात फळ विक्री व टपरी धारक यांना कुठल्याही प्रकारचे व्याज न घेता दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. मोफत धान्य वितरण, मोफत लसीकरण, बेटी बचाव-बेटी पढाव, सुकन्या योजना, जीवन ज्योती विमा योजना, अटल पेंशन योजना, सुरक्षा विमा योजना यासारख्या अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जातात व नागरिक या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतांना दिसून येत आहे.

देशातील विविध समाजाच्या शेवटच्या घटकांला न्याय देण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाने केले आहे. धन्यवाद मोदीजी हे अभियान राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत पाच लाख लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या हस्ताक्षरातील पाच लाख पत्रे पाठवले जाणार आहे. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, मंडल अध्यक्ष अभिजित करंजुले, अभियान संयोजक पवन पाटील, युवामोर्चा जिल्हा प्रभारी रवी तिवारी, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, कृष्णा पाटील, संदीप पाटील, दुर्वेश राणा, जिल्हा पदाधिकारी स्वानंद भणगे, समीर दलाल, शैलेश देशपांडे व मंडल पदाधिकारी त्यात सहभागी झाले होते.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी