शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण कोणाचे? भाजप- शिवसेनेची परस्परांवर कुरघोडी, युतीतच रंगतेय महानाट्य

By अनिकेत घमंडी | Updated: June 8, 2023 06:33 IST

ठाणे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे भाजपला शिरकाव करू देण्यास तयार नाहीत.

अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील दुसरा प्रभावी मानला जाणारा कल्याणलोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या ठाकरे गटाला दिल्याने तेथे शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटात थेट लढत होणार, हे स्पष्ट आहे. दोन वेळा शिवसेनेचे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्याशी तेवढीच तुल्यबळ लढत देऊ शकेल, असा उमेदवार ठाकरे गटाने सध्या तरी समोर आणलेला नाही. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी मात्र गेल्या आठवड्यात शक्तिप्रदर्शन करत लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे फलक लावले आहेत. 

शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप यांच्यात सारे आलबेल असल्याचे दाखवत महाविकास आघाडीप्रमाणेच एकत्र निवडणूक लढण्याचा निर्णय दिल्लीत घेण्यात आला असला, तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष परस्परांवर कुरघोडीची एकही संधी सोडण्यास तयार नाहीत. ठाणे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे भाजपला शिरकाव करू देण्यास तयार नाहीत. त्यासाठी कधी त्यांनी मुंब्रा-कळव्यात जितेंद्र आव्हाड यांच्याशी जुळवून घेतले, तर कधी कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे राजू पाटील यांच्या आग्रहाला मान दिला. भाजपनेही कारखाने, रेल्वे, रस्ते, विकासकामे यावरून शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी सोडलेली नाही. 

त्याला कारणही तसेच आहे. भाजपच्या  विस्तारासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याणमध्ये भेटीगाठी सुरू ठेवल्याने शिंदे गटात अस्वस्थता होती. नुकत्याच दिल्लीत झालेल्या एकत्रित निवडणूक लढवण्याच्या चर्चेनंतर ती शमली असावी. कारण लगोलग श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला कमालीचा वेग आला आहे. त्यांनी विकासपुस्तिका काढत ती घरोघर पोहोचवली. त्यात युती म्हणून भाजपला स्थान दिलेले नाही.

भाजपची साथ निर्णायक

कळवा- मुंब्रा येथे राष्ट्रवादी, कल्याण ग्रामीणमध्ये मनसे, डोंबिवली, कल्याण पूर्व, उल्हासनगर या तिन्ही ठिकाणी भाजप आणि केवळ अंबरनाथ विधानसभेत शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय शिंदे गटाचा खासदार निवडून येणे अशक्य आहे.

चव्हाण, परांजपे लढणार का?

संपूर्ण कोकण पट्ट्यात रवींद्र चव्हाण यांचा संपर्क आहे. युतीच्या मागील मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री, तर सध्या कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असली तरी राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची भूमिका सोडून ते केंद्राच्या राजकारणात जातील का, हा प्रश्न आहे. कल्याण मतदारसंघात राष्ट्रवादीचे आनंद परांजपे शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे लढतील, अशीही चर्चा अधूनमधून सुरू होते. परांजपे यांनी आधी कल्याण, नंतर ठाणे लोकसभा लढवली होती. त्यामुळे आता पुन्हा कल्याणमधून लढण्यास ते उत्सुक नसल्याचे सांगितले जाते. शिवाय एक निवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीने स्वतःहून शिवसेनेला दिलेल्या मतदारसंघात ते का लढतील, हाही मुद्दा आहे.

अनुराग ठाकूर यांचा दौरा दबावासाठी?

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांचे कल्याण लाेकसभा मतदारसंघांत झालेले दौरे सुरुवातीला शिंदे गटाच्या उमेदवाराला अस्वस्थ करणारे ठरले. ठाकूर हे केंद्राला काय अहवाल देतात व भाजप श्रेष्ठी मतदारसंघ बदलाबाबत ऐनवेळी काय भूमिका घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. मात्र, शिंदे गटाने ठाणे किंवा कल्याणपैकी एक मतदारसंघ भाजपसाठी सोडावा, यासाठीचे दबावतंत्र म्हणून ठाकूर यांचा दौरा होता असा शिंदे गटाचा अंदाज आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाlok sabhaलोकसभाkalyanकल्याण