शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मनाचा मोठेपणा दाखविला असता तर समाजाला संघर्ष करण्याची वेळ आली नसती; उद्धव ठाकरेंना टोला

By मुरलीधर भवार | Updated: December 12, 2022 21:31 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपूत्रांंसह आगरी समाजाने संघर्ष केला.

डोंबिवली- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपूत्रांंसह आगरी समाजाने संघर्ष केला. मात्र हा छोटासा विषय होता. एखाद्याने मन मोठे दाखविला असता तर भूमीपूत्रंसह आगरी समाजाला दि. बा. पाटीलांचे नाव देण्यासाठी संघर्ष करण्याची गरज भासली नसती असा टोला सार्वजनिक बांधकाम अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 

डोंबिवलीतील ह.भ. प. संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलात आगरी यूथ फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 18 व्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर,  भाजप आमदार गणपत गायकवाड, भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, समाजाचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, आगरी यूथ फोरमचे प्रमुख गुलाब वङो, आचार्य प्रल्हाद शास्त्री, हभप जयेश पाटील, जर्नादन जिताडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कणसा या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. 

मंत्री चव्हाण यांनी सांगितले, मनाचा मोठेपणा दाखवित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवित नवी मुंबई  आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. 

यावेळी आगरी यूथ फोरचच्या वतीने या प्रकरणी दिल्ली दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी मंत्री चव्हाण यांच्याकडे केली गेली. कार्यक्रमापश्चात मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास आग्रही आहेत. हा विषय या आधीच दिल्ली दरबारी मांडण्यात आला आहे. नक्कीच या विषयात दिल्ली दरबारी देखील यश मिळेल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा