शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

मनाचा मोठेपणा दाखविला असता तर समाजाला संघर्ष करण्याची वेळ आली नसती; उद्धव ठाकरेंना टोला

By मुरलीधर भवार | Updated: December 12, 2022 21:31 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपूत्रांंसह आगरी समाजाने संघर्ष केला.

डोंबिवली- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपूत्रांंसह आगरी समाजाने संघर्ष केला. मात्र हा छोटासा विषय होता. एखाद्याने मन मोठे दाखविला असता तर भूमीपूत्रंसह आगरी समाजाला दि. बा. पाटीलांचे नाव देण्यासाठी संघर्ष करण्याची गरज भासली नसती असा टोला सार्वजनिक बांधकाम अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. 

डोंबिवलीतील ह.भ. प. संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलात आगरी यूथ फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 18 व्या आगरी महोत्सवाचे उद्घाटन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज सायंकाळी करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर,  भाजप आमदार गणपत गायकवाड, भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, समाजाचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, आगरी यूथ फोरमचे प्रमुख गुलाब वङो, आचार्य प्रल्हाद शास्त्री, हभप जयेश पाटील, जर्नादन जिताडे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कणसा या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. 

मंत्री चव्हाण यांनी सांगितले, मनाचा मोठेपणा दाखवित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवित नवी मुंबई  आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. 

यावेळी आगरी यूथ फोरचच्या वतीने या प्रकरणी दिल्ली दरबारी पाठपुरावा करण्याची मागणी मंत्री चव्हाण यांच्याकडे केली गेली. कार्यक्रमापश्चात मंत्री चव्हाण यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास आग्रही आहेत. हा विषय या आधीच दिल्ली दरबारी मांडण्यात आला आहे. नक्कीच या विषयात दिल्ली दरबारी देखील यश मिळेल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा