शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

भाजप आमदारांनी आकड्यांत बोलू नये; शिवसेनेचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 09:55 IST

भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी १३ वर्षांत काय विकासकामे केली?, शिवसेना नेत्याचा सवाल 

कल्याण : डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी १३ वर्षांत काय विकासकामे केली? त्यांनी आकड्यांत बोलू नये, अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी चव्हाण यांच्याविरोधात केली आहे.

चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात टीका केली आहे. परंतु, चव्हाण यांनी मांडलेले मुद्दे जुनेच आहेत. डोंबिवलीतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मंजूर केला होता. त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे. आमदारांनी आकड्यात बोलू नये. विकास झाला आहे की नाही. तो कागदावर झाला की प्रत्यक्षात झाला, हे सांगावे. पालकमंत्री व खासदारांनी केलेल्या विकासकामांमुळे आमदारांचे डोळे दिपले आहेत, असे कदम म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांसाठी ३६० कोटी, डोंबिवली औद्योगिक परिसरातील रस्त्यांसाठी ११० कोटी व अन्य कामांसाठी ३० कोटी, असा निधी मंजूर झाला आहे. त्याची कामेही सुरू झालेली आहेत. याच कामाचा केवळ हिशेब केला तर जवळपास ५०० कोटींची विकासकामे सुरू आहेत. या व्यतिरिक्त पूल, रिंग रोड आदी विकासकामे प्रगतिपथावर आहे, असे कदम पुढे म्हणाले. फडणवीस यांनी साडेसहा हजार कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. मात्र, पैसा काही आला नाही. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा आमदारांनी विकास दाखवा, असे कदम यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीShiv Senaशिवसेना